शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

युवकांच्या प्रयत्नातून फुलली समता नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 00:07 IST

उस्मानाबाद : युवक एकत्र आले की चांगली कामे यशस्वी होतात याची प्रचिती समता मध्यवर्ती गणेश मंडळाच्या युवकांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे़

उस्मानाबाद : युवक एकत्र आले की चांगली कामे यशस्वी होतात याची प्रचिती समता मध्यवर्ती गणेश मंडळाच्या युवकांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे़ विविध समाजाभिमुख उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाच्या युवकांनी समता नगर मधील मुख्य मार्गावर ५५ झाडे लावली असून, त्याचे सुशोभिकरण केले आहे़ त्यामुळे सह्याद्री कॉर्नर ते आनंदनगर कॉर्नरचा रस्ताच फुलला असून, भर उन्हाळ्यातील हिरवी झाडे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना एक वेगळाच आनंद देत आहेत़ तर ‘माणुसकीची भिंत’ या माध्यमातून या युवकांनी जवळपास १५० गरजुंना कपडे उपलब्ध करून दिले आहेत़उस्मानाबाद शहरातील समता नगर भागातील युवकांनी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे़ यात समता मध्यवर्ती गणेश मंडळातील युवकांचे काम आग्रभागी दिसून येते़ प्रत्येक गणेशोत्सव काळात विविध देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन या युवकांनी केले आहे़ गतवर्षी दुष्काळी परिस्थितीत गणेशोत्सव साजरा करताना या युवकांनी समता नगर मधील मुख्य मार्गावर वृक्षारोपन करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला होता़ या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी मंडळाचे अ‍ॅड़ अमर लाहोरे, संदीप साळुंके, वैभव मोरे, सुजित साळुंके, निखिल शेरखाने, समर्थ हाजगुडे, विनय जोशी, अमित साळुंके, उमेश शिंदे, सुरेश डोके यांच्यासह इतर युवकांनी पुढाकार घेऊन ‘हायकस’ प्रजातीची जवळपास ५५ रोपे आणली़ सह्याद्री कॉर्नर ते आनंदनगरच्या कॉर्नरपर्यंत मुख्य मार्गावर वृक्षारोपन करण्यात आले़ वृक्षारोपनानंतर त्याकडे दुर्लक्ष न करताना आठवड्यातून एक ते दोन वेळेस रात्रीच्या सुमारास या युवकांनी स्वत: पुढाकार घेत झाडांना पाणी देण्याचे काम सुरू ठेवले आहे़ परिणामी भर उन्हाळ्यातही ही सर्वच्या सर्व झाडे हिरवीगार दिसत असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत़ गणेशोत्सव काळात लावलेल्या झाडांचे शिवजयंतीनिमित्त युवकांनी सुशोभिकरण केले़ जवळपास ४० हजार रूपये खर्च करून झाडांचे सुशोभिकरण केल्याने निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे़ या मंडळातील युवकांनीच्याच पुढाकाराने समता नगर मध्ये ‘माणुसकीची भिंत’ उभा करण्यात आली आहे़ १९ फेब्रुवारी रोजी ही ‘माणुसकीची भिंत’ उभा करण्यात आली असून, आजवर जवळपास १५० गरजूंना कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ एकूणच पालिकेच्या ‘स्वच्छ शहर, सुंंदर शहर’ उपक्रमाच्याही पुढे जाऊन या युवकांनी खऱ्या अर्थाने ‘सुंदर समतानगर’ तयार करण्याचा संकल्प केला असून, त्याच दिशेने युवकांची वाटचाल सुरू आहे़(प्रतिनिधी)