शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई काळातील विंधन विहिरी संथ गतीत

By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST

सितम सोनवणे, लातूर लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही,

सितम सोनवणे, लातूरलातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही, याची खात्री नाही. ३२२ पैकी १५३ विंधन विहिरींचे काम कासवगतीने सुरू आहेत. केवळ १६९ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, या विहिरींना थोडेबहुत पाणी लागले असून, १२ विंधन विहिरी तर कोरड्याच आहेत.जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतींच्या शिफारशीनुसार या विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. परंतु, टंचाई कक्ष आणि प्रशासन बेफिकीर असल्याने विहिरींच्या कामांना गती नाही. गेल्या तीन महिन्यांत ३२२ पैकी केवळ १६९ विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. १५३ विंधन विहिरींची कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. १६९ मधील १२ विंधन विहिरी कोरड्याच आहेत. टंचाई काळात ही उपाययोजना केली असली, तरी ग्रामस्थांच्या घशाला मात्र कोरडच आहे. ग्रामस्थांची भटकंती थांबलेली नाही. एप्रिल महिन्यात कडाक्याचे उन्हं पडत आहे. ४१ अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे. अशा स्थितीत ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. इकडे प्रशासन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहेत. लातूर तालुक्यात २१, औसा ४, निलंगा २३, रेणापूर १३, अहमदपूर ३२, चाकूर २१, शिरुर अनंतपाळ १०, उदगीर २३, देवणी १९, जळकोट तालुक्यात ३ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या़ पाणीटंचाईच्या काळात या विंधन विहिरीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची व्यवस्था होईल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यासाठी यांत्रिकी विभागाच्या वतीने यांचे निरीक्षण तसेच हातपंप बसविण्याचे कामे केली जात आहेत़ टंचाई कालावधी संपत येत आहे तरी अजून १५३ नवीन विंधन विहिरींची कामे बाकी आहेत़ एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असून, मे महिन्यात तर टंचाई अधिक भेडसावणार आहे. तरीही टंचाई काळातील विंधन विहिरी पूर्ण न झाल्यामुळे टंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्हाधिकारी यांनी या ३२२ नवीन विंधन विहिरीस मान्यता दिली आहे़ या मान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या उपअभियंता यांत्रिकी यांचे कार्यालयाने ग्रामपंचायतींना नवीन विंधन विहिरीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत़ याआदेशानुसार ग्रामपंचायतींनी १६९ नवीन विंधन विहीरीचे कामे पूर्ण झाले आहे़ त्यांतील १५७ विंधन विहिरींना पाणी लागले आहे़ तर १२ विंधन विहिरी कोरड्या गेल्या आहेत़ ४यातील ३३ विंधन विहिरीवर हात पंप बसविण्यात आले आहेत़ २० विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविण्यात आले आहेत़ १६९ विंधन विहिरीची तालुकानिहाय परिस्थिती अशी आहे़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना करूनही कामाला गती नाही.