शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

टंचाई काळातील विंधन विहिरी संथ गतीत

By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST

सितम सोनवणे, लातूर लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही,

सितम सोनवणे, लातूरलातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही, याची खात्री नाही. ३२२ पैकी १५३ विंधन विहिरींचे काम कासवगतीने सुरू आहेत. केवळ १६९ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, या विहिरींना थोडेबहुत पाणी लागले असून, १२ विंधन विहिरी तर कोरड्याच आहेत.जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतींच्या शिफारशीनुसार या विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. परंतु, टंचाई कक्ष आणि प्रशासन बेफिकीर असल्याने विहिरींच्या कामांना गती नाही. गेल्या तीन महिन्यांत ३२२ पैकी केवळ १६९ विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. १५३ विंधन विहिरींची कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. १६९ मधील १२ विंधन विहिरी कोरड्याच आहेत. टंचाई काळात ही उपाययोजना केली असली, तरी ग्रामस्थांच्या घशाला मात्र कोरडच आहे. ग्रामस्थांची भटकंती थांबलेली नाही. एप्रिल महिन्यात कडाक्याचे उन्हं पडत आहे. ४१ अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे. अशा स्थितीत ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. इकडे प्रशासन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहेत. लातूर तालुक्यात २१, औसा ४, निलंगा २३, रेणापूर १३, अहमदपूर ३२, चाकूर २१, शिरुर अनंतपाळ १०, उदगीर २३, देवणी १९, जळकोट तालुक्यात ३ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या़ पाणीटंचाईच्या काळात या विंधन विहिरीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची व्यवस्था होईल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यासाठी यांत्रिकी विभागाच्या वतीने यांचे निरीक्षण तसेच हातपंप बसविण्याचे कामे केली जात आहेत़ टंचाई कालावधी संपत येत आहे तरी अजून १५३ नवीन विंधन विहिरींची कामे बाकी आहेत़ एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असून, मे महिन्यात तर टंचाई अधिक भेडसावणार आहे. तरीही टंचाई काळातील विंधन विहिरी पूर्ण न झाल्यामुळे टंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्हाधिकारी यांनी या ३२२ नवीन विंधन विहिरीस मान्यता दिली आहे़ या मान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या उपअभियंता यांत्रिकी यांचे कार्यालयाने ग्रामपंचायतींना नवीन विंधन विहिरीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत़ याआदेशानुसार ग्रामपंचायतींनी १६९ नवीन विंधन विहीरीचे कामे पूर्ण झाले आहे़ त्यांतील १५७ विंधन विहिरींना पाणी लागले आहे़ तर १२ विंधन विहिरी कोरड्या गेल्या आहेत़ ४यातील ३३ विंधन विहिरीवर हात पंप बसविण्यात आले आहेत़ २० विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविण्यात आले आहेत़ १६९ विंधन विहिरीची तालुकानिहाय परिस्थिती अशी आहे़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना करूनही कामाला गती नाही.