शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर इंधन समस्या

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : तीन पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात १७५ च्या जवळपास पेट्रोलपंप आहेत.

औरंगाबाद : तीन पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात १७५ च्या जवळपास पेट्रोलपंप आहेत. त्यातील एचपीसीएलच्या ४० पेट्रोलपंपांना गेल्या आठवड्यापासून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा उशिराने होऊ लागला आहे. या पंपांवर कधी पेट्रोल संपते, तर कधी डिझेल. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मनमाडजवळील पानेवाडी येथे बीपीसीची पाईपलाईन आहे. मुंबईहून ही पाईपलाईन पानेवाडीपर्यंत आणण्यात आली आहे. या ठिकाणी बीपीसी, एचपीसीएल व आयओसीचे या पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो आहेत. पेट्रोलपुरवठा करणाऱ्या बीपीसीच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम कंपनीने हाती घेतले तसेच मुंबई येथील एचपीसीएलच्या रिफायनरीमध्ये शटडाऊन सुरू झाल्यामुळे याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर झाला. बीपीसीने रतलाम येथून पेट्रोल- डिझेल आणून त्याचा पुरवठा केला. मात्र, एचपीसीएलच्या पेट्रोल पंपवाल्यांना पानेवाडीऐवजी वाशी व लोणी येथील डेपोतून पेट्रोल- डिझेल आणावे लागत आहे. त्या डेपोच्या हद्दीतील पेट्रोल पंपवाल्यांना इंधन दिल्यानंतर मग औरंगाबादेतील पेट्रोल पंपवाल्यांच्या गाड्या भरल्या जात आहेत. यामुळे गाड्या येण्यास दोन ते तीन दिवसांचा उशीर होत आहे. परिणामी, बुधवारी शहरातील एचपीसीएलचे ५ पेट्रोल पंप कोरडे पडले होते. जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर हीच परिस्थिती होती. मात्र, गुरुवारी शहरातील त्या ५ पेट्रोल पंपांवर पेट्रोलने भरलेल्या गाड्या आल्यात. मात्र, जिल्ह्यातील एचपीसीएलच्या काही पंपांवर पेट्रोल होते, डिझेल नव्हते, तर काही पेट्रोल पंपांवर डिझेल होते, तर पेट्रोल संपले होते. काही पेट्रोल पंप कोरडे पडले होते. यासंदर्भात पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एचपीसीएलच्या ४० पेट्रोल पंपांवर रोज दीड ते दोन लाख लिटर पेट्रोल व सुमारे ५ लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते. गेल्या आठवड्यात रोज फक्त २५ टक्केच आवक होत असल्यामुळे पंप कोरडे पडले. दोन दिवस लागतील एचपीसीएलचे विक्री अधिकारी प्रेमसिंग यांनी सांगितले की, पानेवाडी डेपोतील पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच मुंबईतील रिफायनरी पूर्ववत सुरू झाली आहे. आज औरंगाबादेत एचपीसीएलच्या काही पंपांवर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा झाला. शुक्रवारी ग्रामीण भागातील पंपावरही पेट्रोल-डिझेल पोहोचेल. पुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील.ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष वाळूज येथील पेट्रोल पंप मालक आनंद संचेती म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आमचा पेट्रोल पंप कोरडा होता. शहरात ओरड होत असल्यामुळे तेथे लगेच पेट्रोल पाठविले जाते; परंतु ग्रामीण भागातील पंपांकडे कंपन्यांचे दुर्लक्ष होते.