शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

मित्रानेच काढला मित्राचा काटा

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजनगरातील मनोज अशोक गवळी या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले.

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजनगरातील मनोज अशोक गवळी या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले. सोबतच पाणी जार वाटप करणाऱ्या मित्रानेच मनोजचा खून के ल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहोचले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश वायाळ (२२, रा. राजनगर) या संशयिताला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. चोरीच्या उद्देशाने आरोपी ऋषिकेश वायाळने मनोजचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, असे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले. मनोजचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासात अखेर वायाळने हा खून केल्याचे समोर आले. आरोपी वायाळ आणि मनोज हे दोघेही सोबतच पाणी जार वाटप करण्याचे काम करीत होते. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी वायाळ दिवसभर मनोजसोबतच होता. शनिवारी मनोज घरी एकटाच होता वायाळ झोपण्यासाठी त्याच्या घरी गेला. व्हाईटनरच्या नशेत असलेल्या वायाळने रात्री मनोजच्याच घरात पैसे चोरण्याचा प्रयत्नकेला. अचानक मनोज झोपेतून उठला. आपला मित्र घरात चोरी करीत असल्याचे नजरेस पडताच मनोजने त्याला जाब विचारला असता वायाळने त्याचा गळा दाबला आणि बाजूला पडलेला दगड उचलून मनोजचे डोके ठेचले. तो गतप्राण होताच त्याने तेथून धूम ठोकली. आरोपीने खुद्द असा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.