शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

तीसगावात मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:57 IST

ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने ५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढले.

वाळूज महानगर : अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा बजावूनही अतिक्रमण काढले जात नसल्याने तीसगाव ग्रामपंचायतीने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने ५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढले. अनेक वर्षांनंतर गावातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा १०० पेक्षा अधिक लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, दुरावस्थाही झाली आहे. ग्रामपंचायतीने रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४२ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. रस्ता कामात अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले; परंतुसंबंधित अतिक्रमित मालमत्ताधारकांकडून नोटिसीला प्रतिसाद दिला जात नाही.

त्यामुळे ग्रामपंचायतीने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवायला सुरुवात केली. दिवसभरात ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यावरील जवळपास ३५ ते ४० मालमत्ताधारकांचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढले. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. उर्वरित अतिक्रमण बुधवारी (दि.२३) काढण्यात येणार असल्याचे सरपंच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.

अतिक्रमणासह दुरावस्थादोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने रस्त्याचा श्वास कोंडला आहे. शिवाय रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. अरुंद व खराब रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, चारचाकी वाहने एकमेकांना पास होत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती.

 

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण