शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तीसगावात मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:57 IST

ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने ५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढले.

वाळूज महानगर : अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा बजावूनही अतिक्रमण काढले जात नसल्याने तीसगाव ग्रामपंचायतीने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने ५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढले. अनेक वर्षांनंतर गावातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा १०० पेक्षा अधिक लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, दुरावस्थाही झाली आहे. ग्रामपंचायतीने रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४२ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. रस्ता कामात अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले; परंतुसंबंधित अतिक्रमित मालमत्ताधारकांकडून नोटिसीला प्रतिसाद दिला जात नाही.

त्यामुळे ग्रामपंचायतीने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवायला सुरुवात केली. दिवसभरात ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यावरील जवळपास ३५ ते ४० मालमत्ताधारकांचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढले. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. उर्वरित अतिक्रमण बुधवारी (दि.२३) काढण्यात येणार असल्याचे सरपंच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.

अतिक्रमणासह दुरावस्थादोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने रस्त्याचा श्वास कोंडला आहे. शिवाय रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. अरुंद व खराब रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, चारचाकी वाहने एकमेकांना पास होत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती.

 

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण