शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 3, 2023 20:00 IST

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली

छत्रपती संभाजीनगर : आता चार भिंतींच्या वर्गातून मी मुक्त झालो आहे... माझ्या उर्वरित आयुष्याचे लक्ष्य आता नाट्यक्षेत्राला आणि विद्यार्थ्यांमधील दडलेल्या कलाकारांना जागविणे व त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचविणे हेच राहणार आहे. यामुळे कलाकार जमवायचे, नाटक, एकांकिका बसवायच्या आणि ते दाखवत गावोगाव मनसोक्त भटकायचे. लोककलेचा प्रसार-प्रचार करायचा, असे आयुष्यातील उत्तरार्धातील नियोजन सेवानिवृत्त प्रा. दिलीप महालिंगे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव केला. एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना मागील ३० वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या कृतज्ञतेसाठी आठवडाभरात ‘ऋणानुबंध’ व ‘जागर माणूसपणाचा’ असे दोन कार्यक्रम घेण्याची बहुतेक राज्यातील पहिलीच वेळ असेल. असे हे भाग्यवान प्राध्यापक म्हणजे विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. दिलीप महालिंगे आहेत. २८ फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त झाले.

महाकवी वामनदादा कर्डक यांचे सान्निध्य लाभलेले प्रा. महालिंगे सरांनी मागील ३५ वर्षांत हजारो विद्यार्थांना ज्ञानदान दिले, शेकडो कलाकार घडविले, त्या माजी विद्यार्थांनी मिळून स्वखर्चातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, महालिंगे सरांनी गॅदरिंग असो, युथ फेस्टिव्हल असो, त्यानिमित्ताने बसविलेल्या एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, लावणी, वगनाट्य माजी विद्यार्थ्यांनी तेवढ्याच ताकदीने यावेळी सादर केले. दोन्ही कार्यक्रमांत तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल्ल होते. मुख्य प्रवेशद्वारापासूनच हलगीच्या जोरदार वादन व विद्यार्थ्यांनी नृत्य करून जल्लोष केला. स्टेजवर साकारलेल्या पारावर बसून प्रा. महालिंगे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या ते त्यांचे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे व प्रा. सुनील पाटील यांनी. ज्यांनी आपल्यावर वडिलांसारखे प्रेम केले, नाट्यक्षेत्रातील ‘अ, ब, क, ड’ शिकविले, त्या प्रा. महालिंगे सरांमधील ‘माणूसकी’चे विविध पैलू या गप्पांमधून नव्याने समोर आले.

तृतीयपंथींना नायक बनविलेया देशातील पुरुष व स्त्री राज्यकर्ते म्हणून निष्क्रिय ठरले. यामुळे आता तृतीयपंथींच्या हातात सत्ता द्या, ते देश चांगला चालवतील, कारण, भ्रष्ट्राचार करून नेत्यांचे पोट पुढे येतात; पण तृतीयपंथीच्या पुढे कोणी नाही आणि पाठीमागेही कोणी नाही, त्यामुळे पोट पुढे यायचे कारण नाही. मग ते राजकारण जनतेसाठीच करणार, अशा क्रांतिकारक विचारांची ‘लोकतंत्र हाय हाय’ ही एकांकिका बसविली. ती एकांकिका युथ फेस्टिव्हलच नव्हे तर देशपातळीवर गाजली. यात खऱ्या अर्थाने तृतीयपंथींना ‘नायक’ केले, असेही प्रा. महालिंगे यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद