शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 3, 2023 20:00 IST

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली

छत्रपती संभाजीनगर : आता चार भिंतींच्या वर्गातून मी मुक्त झालो आहे... माझ्या उर्वरित आयुष्याचे लक्ष्य आता नाट्यक्षेत्राला आणि विद्यार्थ्यांमधील दडलेल्या कलाकारांना जागविणे व त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचविणे हेच राहणार आहे. यामुळे कलाकार जमवायचे, नाटक, एकांकिका बसवायच्या आणि ते दाखवत गावोगाव मनसोक्त भटकायचे. लोककलेचा प्रसार-प्रचार करायचा, असे आयुष्यातील उत्तरार्धातील नियोजन सेवानिवृत्त प्रा. दिलीप महालिंगे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव केला. एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना मागील ३० वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या कृतज्ञतेसाठी आठवडाभरात ‘ऋणानुबंध’ व ‘जागर माणूसपणाचा’ असे दोन कार्यक्रम घेण्याची बहुतेक राज्यातील पहिलीच वेळ असेल. असे हे भाग्यवान प्राध्यापक म्हणजे विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. दिलीप महालिंगे आहेत. २८ फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त झाले.

महाकवी वामनदादा कर्डक यांचे सान्निध्य लाभलेले प्रा. महालिंगे सरांनी मागील ३५ वर्षांत हजारो विद्यार्थांना ज्ञानदान दिले, शेकडो कलाकार घडविले, त्या माजी विद्यार्थांनी मिळून स्वखर्चातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, महालिंगे सरांनी गॅदरिंग असो, युथ फेस्टिव्हल असो, त्यानिमित्ताने बसविलेल्या एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, लावणी, वगनाट्य माजी विद्यार्थ्यांनी तेवढ्याच ताकदीने यावेळी सादर केले. दोन्ही कार्यक्रमांत तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल्ल होते. मुख्य प्रवेशद्वारापासूनच हलगीच्या जोरदार वादन व विद्यार्थ्यांनी नृत्य करून जल्लोष केला. स्टेजवर साकारलेल्या पारावर बसून प्रा. महालिंगे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या ते त्यांचे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे व प्रा. सुनील पाटील यांनी. ज्यांनी आपल्यावर वडिलांसारखे प्रेम केले, नाट्यक्षेत्रातील ‘अ, ब, क, ड’ शिकविले, त्या प्रा. महालिंगे सरांमधील ‘माणूसकी’चे विविध पैलू या गप्पांमधून नव्याने समोर आले.

तृतीयपंथींना नायक बनविलेया देशातील पुरुष व स्त्री राज्यकर्ते म्हणून निष्क्रिय ठरले. यामुळे आता तृतीयपंथींच्या हातात सत्ता द्या, ते देश चांगला चालवतील, कारण, भ्रष्ट्राचार करून नेत्यांचे पोट पुढे येतात; पण तृतीयपंथीच्या पुढे कोणी नाही आणि पाठीमागेही कोणी नाही, त्यामुळे पोट पुढे यायचे कारण नाही. मग ते राजकारण जनतेसाठीच करणार, अशा क्रांतिकारक विचारांची ‘लोकतंत्र हाय हाय’ ही एकांकिका बसविली. ती एकांकिका युथ फेस्टिव्हलच नव्हे तर देशपातळीवर गाजली. यात खऱ्या अर्थाने तृतीयपंथींना ‘नायक’ केले, असेही प्रा. महालिंगे यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद