शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 3, 2023 20:00 IST

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली

छत्रपती संभाजीनगर : आता चार भिंतींच्या वर्गातून मी मुक्त झालो आहे... माझ्या उर्वरित आयुष्याचे लक्ष्य आता नाट्यक्षेत्राला आणि विद्यार्थ्यांमधील दडलेल्या कलाकारांना जागविणे व त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचविणे हेच राहणार आहे. यामुळे कलाकार जमवायचे, नाटक, एकांकिका बसवायच्या आणि ते दाखवत गावोगाव मनसोक्त भटकायचे. लोककलेचा प्रसार-प्रचार करायचा, असे आयुष्यातील उत्तरार्धातील नियोजन सेवानिवृत्त प्रा. दिलीप महालिंगे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव केला. एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना मागील ३० वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या कृतज्ञतेसाठी आठवडाभरात ‘ऋणानुबंध’ व ‘जागर माणूसपणाचा’ असे दोन कार्यक्रम घेण्याची बहुतेक राज्यातील पहिलीच वेळ असेल. असे हे भाग्यवान प्राध्यापक म्हणजे विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. दिलीप महालिंगे आहेत. २८ फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त झाले.

महाकवी वामनदादा कर्डक यांचे सान्निध्य लाभलेले प्रा. महालिंगे सरांनी मागील ३५ वर्षांत हजारो विद्यार्थांना ज्ञानदान दिले, शेकडो कलाकार घडविले, त्या माजी विद्यार्थांनी मिळून स्वखर्चातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, महालिंगे सरांनी गॅदरिंग असो, युथ फेस्टिव्हल असो, त्यानिमित्ताने बसविलेल्या एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, लावणी, वगनाट्य माजी विद्यार्थ्यांनी तेवढ्याच ताकदीने यावेळी सादर केले. दोन्ही कार्यक्रमांत तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल्ल होते. मुख्य प्रवेशद्वारापासूनच हलगीच्या जोरदार वादन व विद्यार्थ्यांनी नृत्य करून जल्लोष केला. स्टेजवर साकारलेल्या पारावर बसून प्रा. महालिंगे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या ते त्यांचे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे व प्रा. सुनील पाटील यांनी. ज्यांनी आपल्यावर वडिलांसारखे प्रेम केले, नाट्यक्षेत्रातील ‘अ, ब, क, ड’ शिकविले, त्या प्रा. महालिंगे सरांमधील ‘माणूसकी’चे विविध पैलू या गप्पांमधून नव्याने समोर आले.

तृतीयपंथींना नायक बनविलेया देशातील पुरुष व स्त्री राज्यकर्ते म्हणून निष्क्रिय ठरले. यामुळे आता तृतीयपंथींच्या हातात सत्ता द्या, ते देश चांगला चालवतील, कारण, भ्रष्ट्राचार करून नेत्यांचे पोट पुढे येतात; पण तृतीयपंथीच्या पुढे कोणी नाही आणि पाठीमागेही कोणी नाही, त्यामुळे पोट पुढे यायचे कारण नाही. मग ते राजकारण जनतेसाठीच करणार, अशा क्रांतिकारक विचारांची ‘लोकतंत्र हाय हाय’ ही एकांकिका बसविली. ती एकांकिका युथ फेस्टिव्हलच नव्हे तर देशपातळीवर गाजली. यात खऱ्या अर्थाने तृतीयपंथींना ‘नायक’ केले, असेही प्रा. महालिंगे यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद