शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

कृषीला मोफत वीज अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:49 IST

तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.पत्रकारांशी बोलताना गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळातील अवघ्या दोन जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांची थकबाकी २३६५ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी ११९८ कोटी ही थकबाकीची मूळ रक्कम आहे. थकबाकी वसुलीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या; परंतु शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्या राज्यात कृषिपंपांची संख्या मोठी असल्यामुळे मोफत वीज देणे परवडणारे नाही.शहरातही वीज चोरी आणि थकबाकी वसुलीबाबत मोहीम राबविण्यात आली. तेव्हा २ लाख वीज चोरी व सदोष मीटर आढळले, यांना महावितरणने ८० लाख रुपयांचे वीज बिल आकारले आहे.शोधमोहिमेत अनेक वीज ग्राहक गायब असल्याची बाबही समोर आली आहे. शहरात सध्या १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणारे २२५५ ग्राहक आहेत. यांच्याकडे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यापैकी २५२ ग्राहकांकडून अवघी २ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित ९७४ ग्राहकांकडे १७ कोटी ७० लाखांची थकबाकी असून, या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. १६५ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, यांच्याकडे ३ कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे असले तरी ८६४ ग्राहक हे सापडतच नाहीत. यांच्याकडे १९ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.महावितरणच्या कर्मचाºयांनी सुरू केलेली ग्राहकांची शोधमोहीम ही २० जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मात्र शहरातील वीज ग्राहकांचे सविस्तर पत्ते नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येईल. ज्यामुळे यापुढे गायब ग्राहकांची संख्या कमी होईल. त्यांना वीज बिल वेळेवर व नियमित मिळेल.विद्युत सुरक्षा सप्ताहऔरंगाबाद परिमंडळामध्ये ११ ते १८ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ११ जानेवा रोजी शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या सप्ताहामध्ये विद्युत सुरक्षा संदेश पुस्तिकेचे विमोचन केले जाईल. दोन्ही जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंबंधीची ३० मिनिटांची चित्रफीत दाखवली जाईल.