शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

कृषीला मोफत वीज अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:49 IST

तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.पत्रकारांशी बोलताना गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळातील अवघ्या दोन जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांची थकबाकी २३६५ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी ११९८ कोटी ही थकबाकीची मूळ रक्कम आहे. थकबाकी वसुलीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या; परंतु शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्या राज्यात कृषिपंपांची संख्या मोठी असल्यामुळे मोफत वीज देणे परवडणारे नाही.शहरातही वीज चोरी आणि थकबाकी वसुलीबाबत मोहीम राबविण्यात आली. तेव्हा २ लाख वीज चोरी व सदोष मीटर आढळले, यांना महावितरणने ८० लाख रुपयांचे वीज बिल आकारले आहे.शोधमोहिमेत अनेक वीज ग्राहक गायब असल्याची बाबही समोर आली आहे. शहरात सध्या १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणारे २२५५ ग्राहक आहेत. यांच्याकडे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यापैकी २५२ ग्राहकांकडून अवघी २ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित ९७४ ग्राहकांकडे १७ कोटी ७० लाखांची थकबाकी असून, या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. १६५ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, यांच्याकडे ३ कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे असले तरी ८६४ ग्राहक हे सापडतच नाहीत. यांच्याकडे १९ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.महावितरणच्या कर्मचाºयांनी सुरू केलेली ग्राहकांची शोधमोहीम ही २० जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मात्र शहरातील वीज ग्राहकांचे सविस्तर पत्ते नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येईल. ज्यामुळे यापुढे गायब ग्राहकांची संख्या कमी होईल. त्यांना वीज बिल वेळेवर व नियमित मिळेल.विद्युत सुरक्षा सप्ताहऔरंगाबाद परिमंडळामध्ये ११ ते १८ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ११ जानेवा रोजी शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या सप्ताहामध्ये विद्युत सुरक्षा संदेश पुस्तिकेचे विमोचन केले जाईल. दोन्ही जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंबंधीची ३० मिनिटांची चित्रफीत दाखवली जाईल.