शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषीला मोफत वीज अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:49 IST

तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.पत्रकारांशी बोलताना गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळातील अवघ्या दोन जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांची थकबाकी २३६५ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी ११९८ कोटी ही थकबाकीची मूळ रक्कम आहे. थकबाकी वसुलीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या; परंतु शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्या राज्यात कृषिपंपांची संख्या मोठी असल्यामुळे मोफत वीज देणे परवडणारे नाही.शहरातही वीज चोरी आणि थकबाकी वसुलीबाबत मोहीम राबविण्यात आली. तेव्हा २ लाख वीज चोरी व सदोष मीटर आढळले, यांना महावितरणने ८० लाख रुपयांचे वीज बिल आकारले आहे.शोधमोहिमेत अनेक वीज ग्राहक गायब असल्याची बाबही समोर आली आहे. शहरात सध्या १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणारे २२५५ ग्राहक आहेत. यांच्याकडे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यापैकी २५२ ग्राहकांकडून अवघी २ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित ९७४ ग्राहकांकडे १७ कोटी ७० लाखांची थकबाकी असून, या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. १६५ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, यांच्याकडे ३ कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे असले तरी ८६४ ग्राहक हे सापडतच नाहीत. यांच्याकडे १९ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.महावितरणच्या कर्मचाºयांनी सुरू केलेली ग्राहकांची शोधमोहीम ही २० जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मात्र शहरातील वीज ग्राहकांचे सविस्तर पत्ते नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येईल. ज्यामुळे यापुढे गायब ग्राहकांची संख्या कमी होईल. त्यांना वीज बिल वेळेवर व नियमित मिळेल.विद्युत सुरक्षा सप्ताहऔरंगाबाद परिमंडळामध्ये ११ ते १८ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ११ जानेवा रोजी शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या सप्ताहामध्ये विद्युत सुरक्षा संदेश पुस्तिकेचे विमोचन केले जाईल. दोन्ही जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंबंधीची ३० मिनिटांची चित्रफीत दाखवली जाईल.