शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जालना-वडीगोद्री मार्गाचे लवकरच चौपदरीकरण - दानवे

By admin | Updated: January 30, 2016 00:21 IST

अंबड : जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.

अंबड : जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.अंबड येथील नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अंबड शहर व तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण सरकारी बजेटमधून उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.भाजपा प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खा. दानवे यांचा चक्री चौक येथे नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, आ. नारायण कुचे, माजी आ.शिवाजी चोथे, माजी आ. विलास खरात, तालुकाध्यक्ष अवधूत खडके, जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, साहेबराव खरात, बबन बुंदेलखंडे, शहराध्यक्ष रमेश शहाणे, देविदास कुचे, अंबादास अंभोरे, किरण खरात, औदुंबर बागडे, प्रसाद झाडे, नारायण कोळपे, सुभाष देंडगे आदींची उपस्थिती होती. खा.दानवे म्हणाले की, आपण ३५ वर्षांच्या पक्षसेवेनंतर या पदापर्यंत पोहचू शकलो. आपल्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आपला कोणताही नातेवाईक राजकारणात नव्हता. तरीही आपणाला केवळ पक्षनिष्ठा व जनसेवेच्या बळावरच ग्रामपंचायत सदस्यापासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत प्रवास करता आला. एका सामान्य कार्यकर्त्याचा असा प्रवास केवळ भाजपामध्येच शक्य आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सतत कार्यरत आहोत. अंबड-पाचोड रस्त्यासाठी केंद्राच्या निधीतून १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच अंबड व घनसावंगी तालुक्यासाठी महत्वाचा असलेल्या जालना-वडीगोद्री या मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा खा.दानवे यांनी केली. प्रास्ताविकात अवधूत खडके यांनी खा. दानवे यांच्याकडे अंबड तालुक्यात विविध विकास योजना राबविण्याची मागणी केली. माजी आ.शिवाजीराव चोथे यांनी आपल्या भाषणात जालना-वडीगोद्री चौपदरीकरण मागणीचा पुनरूच्चार केला. हा धागा पकडून प्रदेशाध्यक्ष खा.दानवे म्हणाले की, अभी मेरे पास अलाद्दीन का चिराग है, जितना मांगो मिलेगा. (वार्ताहर)