शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

चार हजार मोरांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 15, 2015 00:44 IST

विलास भोसले , पाटोदा देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.

विलास भोसले , पाटोदादेशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. अभयारण्यातील मोरांसाठी चारा, पाण्याची सोेयच नसल्याने मोरांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळाने केवळ माणसांनाच छळले आहे असे नाही तर पक्ष्यांचेही हाल सुरू आहेत.या अभयारण्याचा कारभार पैठण व औरंगाबाद येथील वन कार्यालयातून चालतो. त्यामुळे कारभार रामभरोसे आहे. एक वनक्षेत्रपाल व तीन वनरक्षक इतका कर्मचारी वर्ग आहे. पैकी वनरक्षकाचे एक पद रिक्त आहे. कर्मचारी अभयारण्यात २४ तास उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, ते चार-चार दिवस फिरकत नाहीत. मोरांना पाणी, चारा आहे की नाही ? हे ही जाणून घेण्याची तसदी ते घेत नाहीत. त्यामुळे मोरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची कैफियत पक्षीमित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी व्यक्त केली.सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव मिसाळ म्हणाले, मोरांबरोबरच अभयारण्यातील इतर प्राण्यांबाबत प्रशासन उदासिन आहे. राष्ट्रीय पक्षाचे जीवन उध्दवस्त होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. वनक्षेत्रापाल जी. एन. कांबळे म्हणाले, पाणी, खाद्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. वरिष्ठांनाही या संदर्भात कळविले आहे.अभयारण्यात ग्लेरेसिडीया ही विदेशी झाडे जास्त आहेत.४उन्हाळ्यात पानगळ झाल्यानंतर उष्णता वाढते. परिणामी प्रजनन क्षमता कमी होते.४सीताफळ, करवंद, लिंब, पिंपळ, वड अशी स्वदेशी झाडे वाढली पाहिजेत.४गतवर्षी अभयारण्यात साडेचार हजारावर मोर होते.४जानेवारी २०१५ मध्ये केलेल्या वन्यजीव गणनेनुसार केवळ चार हजार मोर शिल्लक आहेत.वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरांना चारा, पाणी मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात पाणवठे, कुंड्या तयार केल्या. परंतु आता त्या फुटल्या आहेत. त्यामुळे त्यात पाणी साचत नाही. विदेशी झाडांमुळे मोरांना चारा मिळत नाही. त्यामुळे देशी प्रजातीची झाडे वाढवावीत.- सिध्दार्थ सोनवणे, पक्षीमित्र तथा सदस्य, सेन्सिटिव्ह झोन, नायगाव