शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

बीड उपविभागातील ५ पैकी ४ पोलीस ठाणे ‘लॉकअप’विनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:45 IST

एका आयएसओ मानांकनप्राप्त ठाण्यासह तीन ठाण्यांना ‘लॉकअप’ची सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी आयएसओ करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत, तर दुस-या बाजूला एका आयएसओ मानांकनप्राप्त ठाण्यासह तीन ठाण्यांना ‘लॉकअप’ची सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ बीड शहर ठाण्यातच ही सुविधा असून, चारही ठाण्याचे आरोपी येथे डांबले जातात. ‘लॉकअप’ (कोठडी) नसल्यामुळे पोलिसांची नजर चुकवून आरोपी पलायन करीत असल्याच्या घटना घडत आहेत.शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सय्यद सलाऊद्दीन सिद्दीकी यांना निलंबीत केले होते. हाच धागा पकडून बीड उपविभागातील ठाण्यांच्या ‘लॉक अप’ चा आढावा घेतला असता, ही माहिती समोर आली. बीड उपविभागात बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पेठबीड व पिंपळनेर अशी पाच पोलीस ठाणीयेतात.या पाचपैकी केवळ बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींना ठेवण्यासाठी ‘लॉकअप’ची सुविधा करण्यात आली आहे. याच ‘लॉकअप’मध्ये इतर सर्व ठाण्यांचे आरोपी ठेवले जातात.वास्तविक पाहता चार ठाण्यांच्या आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता शहर ठाण्यातील जागा अपुरी पडते; परंतु याकडे दुर्लक्ष करीत नाइलाजास्तव शहर ठाण्यात आरोपींना डांबणे भाग पडत आहे. त्यामुळे आरोपींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आरोपींवर नजर ठेवणेही कर्मचा-यांसाठी जिकिरीचे बनत असून, वेळप्रसंगी त्यांना निलंबनाच्या कारवाईस बळी पडावे लागते. प्रत्येक ठाण्यात लॉक अपची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.