शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

चार पोलिस ठाण्यांचे दूरध्वनी बंद

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्काअभावी तक्रारदार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्काअभावी तक्रारदार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. संवादाच्या प्रमुख साधनाच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने पोलिसांच्या सेवेवर परिणाम होत आहे. कायदा आणि सुव्यस्थेमुळे सामाजिक शांतता टिकून आहे. पूर्वीपेक्षा गावातील तंटे, भांडणे आदी घटना संपर्कामुळे टळू लागल्या आहेत. एखाद्या गावातील किंवा निर्जनस्थळी झालेल्या घटना प्रत्यक्ष ठाण्यात येऊन सांगणे शक्य होत नाही. दूरध्वनी हे पोलिस आणि नागरिकांतील संवादाचे प्रमुख साधन आहे; परंतु या साधनाची सुलभता वाटण्याऐवजी ग्रामीण पोलिसांना कटकट वाटत आहे. म्हणून की काय मागील अनेक महिन्यांपासून ग्रामीण ठाण्यातील लॅन्डलाईन दूरध्वनी बंद आहेत. सध्या नर्सी, कुरूंदा, औंढा व वसमत ग्रामीण ठाण्याची दूरध्वनी सेवा बंद अवस्थेत आहे. त्याच्या दुरूस्तीकडे वरिष्ठांनी साफ दुर्लक्ष केले आहे. अनेक अधिकारी नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांकही अनेक गावातील लोकांना माहिती झालेले नाहीत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील लोकांची पायपीट वाढली आहे. किरकोळ माहितीसाठी दिवसभराचे काम सोडून संबंधित ठाणे गाठावे लागत आहे. शिवाय ठाण्यातील कर्मचारी त्यांचे मोबाईल उचलत नाहीत. यासंदर्भात कुरूंदा ठाण्याचे पोनि नानासाहेब नागदरे यांना विचारले असता, बिल थकित असल्याने दूरध्वनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. इतर ठिकाणची सेवाही याच कारणाने बंद आहे. (प्रतिनिधी)