शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

चार पोलिस ठाण्यांचे दूरध्वनी बंद

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्काअभावी तक्रारदार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्काअभावी तक्रारदार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. संवादाच्या प्रमुख साधनाच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने पोलिसांच्या सेवेवर परिणाम होत आहे. कायदा आणि सुव्यस्थेमुळे सामाजिक शांतता टिकून आहे. पूर्वीपेक्षा गावातील तंटे, भांडणे आदी घटना संपर्कामुळे टळू लागल्या आहेत. एखाद्या गावातील किंवा निर्जनस्थळी झालेल्या घटना प्रत्यक्ष ठाण्यात येऊन सांगणे शक्य होत नाही. दूरध्वनी हे पोलिस आणि नागरिकांतील संवादाचे प्रमुख साधन आहे; परंतु या साधनाची सुलभता वाटण्याऐवजी ग्रामीण पोलिसांना कटकट वाटत आहे. म्हणून की काय मागील अनेक महिन्यांपासून ग्रामीण ठाण्यातील लॅन्डलाईन दूरध्वनी बंद आहेत. सध्या नर्सी, कुरूंदा, औंढा व वसमत ग्रामीण ठाण्याची दूरध्वनी सेवा बंद अवस्थेत आहे. त्याच्या दुरूस्तीकडे वरिष्ठांनी साफ दुर्लक्ष केले आहे. अनेक अधिकारी नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांकही अनेक गावातील लोकांना माहिती झालेले नाहीत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील लोकांची पायपीट वाढली आहे. किरकोळ माहितीसाठी दिवसभराचे काम सोडून संबंधित ठाणे गाठावे लागत आहे. शिवाय ठाण्यातील कर्मचारी त्यांचे मोबाईल उचलत नाहीत. यासंदर्भात कुरूंदा ठाण्याचे पोनि नानासाहेब नागदरे यांना विचारले असता, बिल थकित असल्याने दूरध्वनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. इतर ठिकाणची सेवाही याच कारणाने बंद आहे. (प्रतिनिधी)