शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील चारशे अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

By admin | Updated: June 28, 2016 00:58 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे १३१ प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे १३१ प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. यामध्ये सुमारे ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे या प्रकरणांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात १९७२ साली दुष्काळ पडल्यामुळे वि. स. पागे यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. रोजगार हमी योजनेमुळे मजुरांच्या हाताला कामे मिळाली. राज्यातील सिंचन व रस्त्यांची कामे या योजनेतून करण्यास सुरुवात झाली. रोजगार हमी योजनेचा गौरव होण्यास आणि दुसरीकडे योजनेत गैरव्यवहार होण्याचे प्रमाणही वाढले. २००४ मध्ये रोजगार हमी योजना केंद्र सरकारने राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नावाने ही योजना सुरू झाली. २००६ मध्ये रोहयो बंद करून ही योजना राबविण्यात येऊ लागली. मग्रारोहयोअंतर्गत ग्रामपंचायतमार्फत ५० टक्के आणि योजनेमार्फत ५० टक्के कामे करण्यात येऊ लागली. गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता यांना कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे कामे होत नसल्यामुळे या कामांच्या तक्रारी होऊ लागल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४० प्रकरणांत चौकशी सुरू आहे. त्याखालोखाल परभणी आणि बीडचा क्रमांक आहे. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील ही चौकशी असून, यांचा निपटारा करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. रोहयोअंतर्गत ९८ प्रकरणांची तर मग्रारोहयोअंतर्गत ३३, अशा १३१ प्रकरणांची विभागीय चौकशी केली जात आहे. यामध्ये मजूर उपस्थिती नसताना कामे पूर्ण झाल्याचे दाखविणे, कुशल काम न करता बिले उचलणे, परस्पर मजुरी हडप करणे, मंजुरी नसतानाही मंजुरी दिल्याचे दाखवून पैसे काढणे, यासह विविध प्रकारांमुळे कामांची चौकशी होत आहे. ४या चौकशीमध्ये गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, हजेरी सहायक आदींचा समावेश आहे.