शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शहरात तीन तरुणांसह चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात ...

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात शिकाऊ डॉक्टर, चिकलठाणा येथे अभियंता तर मकई गेटजवळ राहणारा पदवीधर तरुण आणि मुकुंदवाडी परिसरात ५० वर्षीय मजुराचा यात समावेश आहे.

शिकाऊ डॉक्टरने मृत्यूला कवटाळले

सातारा परिसरातील ज्योती प्राईड सोसायटीतील रहिवासी सागर महेंद्र कुलकर्णी (२१) याने मंगळवारी सकाळी ११:३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर हा लातूर येथील एका डेंटल कॉलेजमध्ये बी.डी.एस. चे शिक्षण घेत होता. त्याला स्क्रिझोफेनिया हा आजार झाल्यामुळे तो काही महिन्यांपासून घरी आला होता. औरंगाबाद येथील एका खासगी डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. तो बरा झाल्याचे दिसत असताना मंगळवारी त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलले. आवाज देऊनही तो खोलीचे दार उघडत नाही म्हणून त्याच्या आईने शेजारी राहणाऱ्या सुधीर जाधव यांना बोलावले. त्यांनी दार तोडून पाहिले असता सागरने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी त्याला तातडीने घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सातारा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. सागरचे वडील घाटी रुग्णालयात नोकरीला आहेत. मोठा भाऊ पुण्यात इंजिनिअर आहे. तर आई गृहिणी आहे.

=============

तरुण अभियंत्याची आत्महत्या

चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथे विलास शामराव जगताप (२७) या अभियंत्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता घरातील छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला घाटी रुग्णालयात हलविले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी ९ वाजता त्याला तपासून मृत घोषित केले. अत्यंत हसत खेळत राहणाऱ्या विलासने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्याला दोन विवाहित मोठ्या बहिणी आहेत. त्याचे वडील सुतारकाम करतात. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यापासून तो नोकरीच्या शोधात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला.

पदवीधर तरुणाची आत्महत्या

मकई गेटजवळ राहणाऱ्या इमरान खान मुकिम खान (२७) याने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी बेगमपुरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इमरानला एक वर्षाचा मुलगा आहे. पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसह तो राहात होता. तो पदवीधर होता. मात्र तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

=================

मजुराची आत्महत्या

भगीरथ आप्पासाहेब वावरे (५०, रा. अहिल्यानगर, मुकुंदवाडी परिसर) यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता बाथरूमच्या छताला रॉड लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नजरेस पडताच नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वावरे यांना घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वावरे हे मजुरी काम करायचे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाला. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.