शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

शहरात तीन तरुणांसह चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात ...

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात शिकाऊ डॉक्टर, चिकलठाणा येथे अभियंता तर मकई गेटजवळ राहणारा पदवीधर तरुण आणि मुकुंदवाडी परिसरात ५० वर्षीय मजुराचा यात समावेश आहे.

शिकाऊ डॉक्टरने मृत्यूला कवटाळले

सातारा परिसरातील ज्योती प्राईड सोसायटीतील रहिवासी सागर महेंद्र कुलकर्णी (२१) याने मंगळवारी सकाळी ११:३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर हा लातूर येथील एका डेंटल कॉलेजमध्ये बी.डी.एस. चे शिक्षण घेत होता. त्याला स्क्रिझोफेनिया हा आजार झाल्यामुळे तो काही महिन्यांपासून घरी आला होता. औरंगाबाद येथील एका खासगी डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. तो बरा झाल्याचे दिसत असताना मंगळवारी त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलले. आवाज देऊनही तो खोलीचे दार उघडत नाही म्हणून त्याच्या आईने शेजारी राहणाऱ्या सुधीर जाधव यांना बोलावले. त्यांनी दार तोडून पाहिले असता सागरने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी त्याला तातडीने घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सातारा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. सागरचे वडील घाटी रुग्णालयात नोकरीला आहेत. मोठा भाऊ पुण्यात इंजिनिअर आहे. तर आई गृहिणी आहे.

=============

तरुण अभियंत्याची आत्महत्या

चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथे विलास शामराव जगताप (२७) या अभियंत्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता घरातील छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला घाटी रुग्णालयात हलविले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी ९ वाजता त्याला तपासून मृत घोषित केले. अत्यंत हसत खेळत राहणाऱ्या विलासने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्याला दोन विवाहित मोठ्या बहिणी आहेत. त्याचे वडील सुतारकाम करतात. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यापासून तो नोकरीच्या शोधात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला.

पदवीधर तरुणाची आत्महत्या

मकई गेटजवळ राहणाऱ्या इमरान खान मुकिम खान (२७) याने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी बेगमपुरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इमरानला एक वर्षाचा मुलगा आहे. पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसह तो राहात होता. तो पदवीधर होता. मात्र तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

=================

मजुराची आत्महत्या

भगीरथ आप्पासाहेब वावरे (५०, रा. अहिल्यानगर, मुकुंदवाडी परिसर) यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता बाथरूमच्या छताला रॉड लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नजरेस पडताच नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वावरे यांना घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वावरे हे मजुरी काम करायचे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाला. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.