शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

शहरात तीन तरुणांसह चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात ...

औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेरोजगारीसह इतर कारणांमुळे तीन तरुणांसह चार जणांनी २४ तासांत मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले. सातारा परिसरात शिकाऊ डॉक्टर, चिकलठाणा येथे अभियंता तर मकई गेटजवळ राहणारा पदवीधर तरुण आणि मुकुंदवाडी परिसरात ५० वर्षीय मजुराचा यात समावेश आहे.

शिकाऊ डॉक्टरने मृत्यूला कवटाळले

सातारा परिसरातील ज्योती प्राईड सोसायटीतील रहिवासी सागर महेंद्र कुलकर्णी (२१) याने मंगळवारी सकाळी ११:३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर हा लातूर येथील एका डेंटल कॉलेजमध्ये बी.डी.एस. चे शिक्षण घेत होता. त्याला स्क्रिझोफेनिया हा आजार झाल्यामुळे तो काही महिन्यांपासून घरी आला होता. औरंगाबाद येथील एका खासगी डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. तो बरा झाल्याचे दिसत असताना मंगळवारी त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलले. आवाज देऊनही तो खोलीचे दार उघडत नाही म्हणून त्याच्या आईने शेजारी राहणाऱ्या सुधीर जाधव यांना बोलावले. त्यांनी दार तोडून पाहिले असता सागरने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी त्याला तातडीने घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सातारा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. सागरचे वडील घाटी रुग्णालयात नोकरीला आहेत. मोठा भाऊ पुण्यात इंजिनिअर आहे. तर आई गृहिणी आहे.

=============

तरुण अभियंत्याची आत्महत्या

चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथे विलास शामराव जगताप (२७) या अभियंत्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता घरातील छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला घाटी रुग्णालयात हलविले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी ९ वाजता त्याला तपासून मृत घोषित केले. अत्यंत हसत खेळत राहणाऱ्या विलासने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्याला दोन विवाहित मोठ्या बहिणी आहेत. त्याचे वडील सुतारकाम करतात. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यापासून तो नोकरीच्या शोधात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला.

पदवीधर तरुणाची आत्महत्या

मकई गेटजवळ राहणाऱ्या इमरान खान मुकिम खान (२७) याने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी बेगमपुरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इमरानला एक वर्षाचा मुलगा आहे. पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसह तो राहात होता. तो पदवीधर होता. मात्र तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

=================

मजुराची आत्महत्या

भगीरथ आप्पासाहेब वावरे (५०, रा. अहिल्यानगर, मुकुंदवाडी परिसर) यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता बाथरूमच्या छताला रॉड लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नजरेस पडताच नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वावरे यांना घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वावरे हे मजुरी काम करायचे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाला. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.