शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

साडेचारशे कुटुंबांना मिळणार महेश सेवा निधीचा आधार

By admin | Updated: April 3, 2017 22:39 IST

उस्मानाबाद महाराष्ट्र महेश सेवा निधी ट्रस्ट कार्यरत असून, या ट्रस्टमार्फत दरमहा अडीचशे कुटुंबांना मदतीचा आधार दिला जात आहे.

उस्मानाबाद : समाजसेवा, चळवळ म्हणजे तरी काय? आपल्या सानिध्यात, संपर्कात येणाऱ्या गरजूंना मदतीचा हात देवून त्यांचे जगणे सुलभ करणे हीच खरी सामाजिक सेवा. याच हेतुने महाराष्ट्र महेश सेवा निधी ट्रस्ट कार्यरत असून, या ट्रस्टमार्फत दरमहा अडीचशे कुटुंबांना मदतीचा आधार दिला जात आहे. या ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या काळात हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला असून, लवकरच साडेचारशे कुटुंबांना मदत देण्यात येणार आहे. माहेश्वरी समाजातील आर्थिक दुर्बलांना सहाय्य करण्याच्या हेतुने ओंकारनाथ मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली १९९१ ला महाराष्ट्र महेश सेवा निधीची स्थापना करण्यात येऊन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये या ट्रस्टमार्फत काम सुरू करण्यात आले. मारवाडी समाज तसा उद्योगात अग्रेसर आहेत. मात्र त्यानंतरही काही कुटुंबांची आर्थिक स्थिती दयनीय असल्याचे समोर आल्यानंतर या गरजूंना सामाजिक भावनेने मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्यस्थितीत या ट्रस्टअंतर्गत कोलकत्त्याच्या मातोश्री प्रकोष्टतर्फे १९० जणांना दरमहा एक हजार रुपयांचा निधी मनिआॅर्डरद्वारे पाठविण्यात येतो, तर चेन्नई येथील बन्सीलाल राठी यांच्यामार्फत ४० जणांना मदत देण्यात येते. या ट्रस्टकडे सध्या संग्रह निधी ७० लाखांचा जमा असून, त्यातून येणाऱ्या व्याजापोटीच्या ६४ हजार रुपयांच्या रकमेतून ही मदत केली जाते; मात्र मदतीची रक्कम जास्त आणि उपलब्ध पैसे कमी अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर महेश सेवा निधीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथील मालपाणी परिवाराशी संपर्क साधून या उपक्रमाबाबत माहिती दिली. महेश सेवा निधीचा हा उपक्रम मालपाणी यांना भावल्यानंतर त्यांनी हा उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. याबरोबरच त्यांनी महेश सेवा निधीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही २२ जिल्ह्यात समाजबांधवांकडे जावून निधी गोळा करा, तुम्ही जेवढा निधी गोळा कराल तेवढा निधी मी तुम्हाला देईन असा शब्द दिला. त्यामुळे या उपक्रमाच्या विस्तारासाठी पदाधिकारी जोमाने कामाला लागले आणि मागील काही दिवसांत त्यांनी राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. महेश सेवा निधीचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी (उस्मानाबाद), हिरालाल मालू (पुणे), सत्यनारायण लाहोटी (बीड), नंदलाल मिणियार (नगर), अशोक बंग (लातूर), मधुसुदन गांधी (डोंबिवली), सतीश चरखा (जळगाव) संजय मंत्री (उस्मानाबाद) आदींच्या या दौऱ्याला समाजबांधवांतून चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे २ कोटी ५५ लाखांची रक्कम मिळण्याचे आश्वासन प्राप्त झाले असून, ७० लाखांचा हा ट्रस्ट येत्या ७ एप्रिल रोजी ७ कोटींवर पोहोचला आहे. यातून राज्यातील माहेश्वरी समाजातील ४५० गरजू कुटुंबांना दरमहिना १५०० ते १८०० रुपये रक्कम देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ट्रस्टने राज्यभरातून १२ कोटींचा निधी उभारण्याचे नियोजन आहे. केवळ शासकीय योजनांवर विसंबून न राहता दानशुरांनी समाजातीलच गरजंूच्या मदतीसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)