शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

गड राखला पण...

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील गड राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. सेनेचे संजय शिरसाट येथून दुसऱ्यांदा विजयी झाले.

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील गड राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. सेनेचे संजय शिरसाट येथून दुसऱ्यांदा विजयी झाले. शिरसाट यांनी पहिल्यापासून आघाडी कायम ठेवली; पण तरीही त्यांना भाजपाच्या मधुकर सावंत यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले. लोकांनी सावंत यांच्याही पारड्यात भरभरून मते टाकली. बहुतेक ठिकाणी दोघांनाही जवळपास सारखी मते मिळाली; पण त्यातही दौलताबाद, अब्दीमंडी, वडगाव कोल्हाटी, शरणापूर, पंढरपूर, तसेच शहरातील पदमपुरा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, उस्मानपुरा, एकनाथनगरसारख्या भागाने शिरसाट यांच्यावर एकतर्फी विश्वास दाखविला. त्यामुळेच शिरसाट यांचा विजय निश्चित होऊ शकला. औरंगाबाद पश्चिम हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या भागात शिवसेनेचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या विजयाची सर्वांनाच खात्री होती; पण प्रत्यक्षात भाजपाच्या सावंत यांनी तेवढीच कडवी झुंज दिली. शहर आणि ग्रामीण भागातून संजय शिरसाट आणि सावंत यांना जवळपास बरोबरीची मते मिळाली. मात्र, पदमपुरा येथील सहा मतदान केंद्रांवर शिरसाट यांना एकतर्फी साथ मिळाली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील दौलताबाद, अब्दीमंडी येथे शिरसाट यांचा वरचष्मा दिसून आला. अपवाद वगळता या ठिकाणी एमआयएम पुरस्कृत पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार गंगाधर गाडे आणि शिरसाट या दोघांनाच मते मिळाली. करोडी, साजापूर आणि पंढरपूर येथील मतदारांनीही शिरसाट आणि गाडे या दोघांच्या पदरात मतांचे दान टाकले. त्यामुळे येथे सावंत यांना अतिशय कमी मते मिळाली. सातारा- देवळाई भागात सुमारे वीस हजार मतदार आहेत. या भागातून सावंत आणि शिरसाट यांना सारखीच साथ मिळाली. सावंत हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना एकूण ५४ हजार ३५५ मते मिळाली. विशेषत: त्यांना शहानूरवाडी येथील १३ मतदान केंद्रांवर तसेच पीरबाजार, एकनाथनगर येथील दहा मतदान केंद्रांवर एकतर्फी मतदान झाले. न्यू उस्मानपुरा भागातही सावंत यांच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतदान केले, तर गंगाधर गाडे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी एकूण ३५ हजार मते घेतली. गाडे यांना दलित आणि मुस्लिमबहुल भागांत चांगल्या प्रकारे पहिल्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापाठोपाठ शिरसाट यांनाही काही मते मिळाली; पण भाजपा उमेदवार सावंत यांना मात्र तुरळक मते मिळाली. गाडे यांना छावणीतील पेन्शनपुरा, दर्जीबाजार, कर्णपुरा, नेहरू चौक, तसेच मिटमिटा येथेही चांगली मते मिळाली. काँग्रेसचा परंपरागत मतदार एमआयएमकडे सरकल्याने काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र देहाडे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. देहाडे यांना सर्वच भागात तुरळक मते मिळाली. देहाडे यांना एकूण १४ हजार ७९८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे यांनाही अवघ्या ५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष या ठिकाणी निष्प्रभ ठरले. त्यामुळे आगामी काळातही या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा असाच लढा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर-ग्रामीणमध्ये चांगली साथकांचनवाडी, नक्षत्रवाडी, तसेच शहरातील स्नेहनगर, एकनाथनगर, कोकणवाडी येथेही शिरसाट यांना चांगली मते मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. शिरसाट हे अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांना शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही चांगली साथ मिळाली.