शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:46 IST

जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे.

रत्नाकर तांबट ।लोकमत न्यूज नेटवर्कदुधड : जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. गावाच्या आजूबाजूला झालेले सिमेंट बंधारे, मातीनाला बांधांमुळे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख मिटली आहे. सध्या इतर गावांनाही पाणीपुरवठा करण्याची क्षमता या गावात आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजूबाजूचा परिसर विविध पिके आणि फळबागांनी बहरला असून, राज्यभरातील ग्रामपंचायती काम पाहण्यासाठी गावाला भेटी देत आहेत.औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर गोलटगावपासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या काºहोळ गावातील ग्रामस्थांना जवळपास २०१३ पूर्वी हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत होती. कधी कधी टँकरनेही पाणीपुरवठा करण्यात येत होता.या त्रासाला कंटाळून अनेकांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरलाहोता. यानंतर २०१५ मध्ये ग्रामपंचायत, गावकरी, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने (सीएसआर) गावचा कायापालट केला. सीएसआरने हे गाव सेवा संस्थेला दिले. त्यांच्या सहकार्याने गावात जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. पाहता पाहता जवळपास तीन वर्षांत गावाच्या आजूबाजूला ९ सिमेंट बंधारे व चार मातीनाला बांध तयार करण्यात आले. काम पूर्णत्वास येताच पावसाळ्यात या बंधाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विहीर तसेच बोअर, हँडपंपांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजघडीला बोअर आणि विहिरींची पाणीपातळी ८ ते १० फुटांवर आली आहे. येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजघडीला ४४.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटला आहे.विशेष म्हणजे यापूर्वी पाणी नसल्यामुळे येथील शेतकरी हंगामी पिके घेत असत. फळबागा लागवडीचा कुणी विचारही करीत नव्हता. मात्र, आता गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गव्हासह डाळिंब, द्राक्ष, मोसंबीची पिके घेत आहेत. यामुळे बळीराजाच्या आर्थिक वृद्धीस मदत झाली आहे. पावसाचे पाणी शिवाबाहेर न जाऊ देण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला आहे. येत्या एक वर्षात गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब शिवारात जिरवू, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच सचिन खलसे यांनी दिली.गावाचा झालेला कायापालट पाहून जिल्ह्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावाला आवर्जून भेट देत आहेत. अशी कामे आमच्या गावात करण्याची मागणी होत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता अरविंद येलम यांनी दिली. या कामांसाठी सेवा संस्थेचे सचिव चंद्रशेखर चारठाणकर, उपसरपंच रुख्मिणी खलसे, ग्रामपंचायत सदस्य, संदीप पाचफुले यांच्यासह गावकºयांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती सरपंच हिरामण ढगे यांनी दिली.