शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:46 IST

जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे.

रत्नाकर तांबट ।लोकमत न्यूज नेटवर्कदुधड : जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. गावाच्या आजूबाजूला झालेले सिमेंट बंधारे, मातीनाला बांधांमुळे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख मिटली आहे. सध्या इतर गावांनाही पाणीपुरवठा करण्याची क्षमता या गावात आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजूबाजूचा परिसर विविध पिके आणि फळबागांनी बहरला असून, राज्यभरातील ग्रामपंचायती काम पाहण्यासाठी गावाला भेटी देत आहेत.औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर गोलटगावपासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या काºहोळ गावातील ग्रामस्थांना जवळपास २०१३ पूर्वी हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत होती. कधी कधी टँकरनेही पाणीपुरवठा करण्यात येत होता.या त्रासाला कंटाळून अनेकांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरलाहोता. यानंतर २०१५ मध्ये ग्रामपंचायत, गावकरी, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने (सीएसआर) गावचा कायापालट केला. सीएसआरने हे गाव सेवा संस्थेला दिले. त्यांच्या सहकार्याने गावात जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. पाहता पाहता जवळपास तीन वर्षांत गावाच्या आजूबाजूला ९ सिमेंट बंधारे व चार मातीनाला बांध तयार करण्यात आले. काम पूर्णत्वास येताच पावसाळ्यात या बंधाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विहीर तसेच बोअर, हँडपंपांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजघडीला बोअर आणि विहिरींची पाणीपातळी ८ ते १० फुटांवर आली आहे. येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजघडीला ४४.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटला आहे.विशेष म्हणजे यापूर्वी पाणी नसल्यामुळे येथील शेतकरी हंगामी पिके घेत असत. फळबागा लागवडीचा कुणी विचारही करीत नव्हता. मात्र, आता गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गव्हासह डाळिंब, द्राक्ष, मोसंबीची पिके घेत आहेत. यामुळे बळीराजाच्या आर्थिक वृद्धीस मदत झाली आहे. पावसाचे पाणी शिवाबाहेर न जाऊ देण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला आहे. येत्या एक वर्षात गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब शिवारात जिरवू, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच सचिन खलसे यांनी दिली.गावाचा झालेला कायापालट पाहून जिल्ह्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावाला आवर्जून भेट देत आहेत. अशी कामे आमच्या गावात करण्याची मागणी होत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता अरविंद येलम यांनी दिली. या कामांसाठी सेवा संस्थेचे सचिव चंद्रशेखर चारठाणकर, उपसरपंच रुख्मिणी खलसे, ग्रामपंचायत सदस्य, संदीप पाचफुले यांच्यासह गावकºयांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती सरपंच हिरामण ढगे यांनी दिली.