शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:46 IST

जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे.

रत्नाकर तांबट ।लोकमत न्यूज नेटवर्कदुधड : जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. गावाच्या आजूबाजूला झालेले सिमेंट बंधारे, मातीनाला बांधांमुळे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख मिटली आहे. सध्या इतर गावांनाही पाणीपुरवठा करण्याची क्षमता या गावात आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजूबाजूचा परिसर विविध पिके आणि फळबागांनी बहरला असून, राज्यभरातील ग्रामपंचायती काम पाहण्यासाठी गावाला भेटी देत आहेत.औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर गोलटगावपासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या काºहोळ गावातील ग्रामस्थांना जवळपास २०१३ पूर्वी हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत होती. कधी कधी टँकरनेही पाणीपुरवठा करण्यात येत होता.या त्रासाला कंटाळून अनेकांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरलाहोता. यानंतर २०१५ मध्ये ग्रामपंचायत, गावकरी, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने (सीएसआर) गावचा कायापालट केला. सीएसआरने हे गाव सेवा संस्थेला दिले. त्यांच्या सहकार्याने गावात जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. पाहता पाहता जवळपास तीन वर्षांत गावाच्या आजूबाजूला ९ सिमेंट बंधारे व चार मातीनाला बांध तयार करण्यात आले. काम पूर्णत्वास येताच पावसाळ्यात या बंधाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विहीर तसेच बोअर, हँडपंपांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजघडीला बोअर आणि विहिरींची पाणीपातळी ८ ते १० फुटांवर आली आहे. येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजघडीला ४४.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटला आहे.विशेष म्हणजे यापूर्वी पाणी नसल्यामुळे येथील शेतकरी हंगामी पिके घेत असत. फळबागा लागवडीचा कुणी विचारही करीत नव्हता. मात्र, आता गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गव्हासह डाळिंब, द्राक्ष, मोसंबीची पिके घेत आहेत. यामुळे बळीराजाच्या आर्थिक वृद्धीस मदत झाली आहे. पावसाचे पाणी शिवाबाहेर न जाऊ देण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला आहे. येत्या एक वर्षात गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब शिवारात जिरवू, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच सचिन खलसे यांनी दिली.गावाचा झालेला कायापालट पाहून जिल्ह्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावाला आवर्जून भेट देत आहेत. अशी कामे आमच्या गावात करण्याची मागणी होत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता अरविंद येलम यांनी दिली. या कामांसाठी सेवा संस्थेचे सचिव चंद्रशेखर चारठाणकर, उपसरपंच रुख्मिणी खलसे, ग्रामपंचायत सदस्य, संदीप पाचफुले यांच्यासह गावकºयांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती सरपंच हिरामण ढगे यांनी दिली.