शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

भाजीमार्केट व व्यापारी संकुलाचा मनपाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 19:19 IST

सातारा- देवळाईत पाऊण लाखापेक्षा अधिक लोकवस्तीत भाजी मार्केट, व्यापारी संकुलाचा महापालिका प्रशसनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

सातारा- देवळाई : पाऊण लाखावरील लोकवस्तीमध्ये सुविधांचा अभावऔरंगाबाद : सातारा- देवळाईत पाऊण लाखापेक्षा अधिक लोकवस्तीत भाजी मार्केट, व्यापारी संकुलाचा महापालिका प्रशसनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

गुलमंडी क्षेत्राला मनपाने आकारलेला कर सातारा- देवळाईकरांकडून वसूल केला जातो. मग त्या तुलनेत सेवासुविधा देण्यावर मात्र अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा भर नाही. वसुली मोहीम राबवून वसुलीचा तगादा लावला जातो. नवीन मालमत्तेला देखील कर लावण्यात येत आहे. कर वसुलीसाठी अधिकारी जेवढी मेहनत घेतात, तेवढी सुविधा पुरविण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मनपाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही त्यावर राजकीय श्रेय घेण्यात पदाधिकारी गुंतले असून, सातारा- देवळाईच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप रहिवाशांतून केला जात आहे.

विस्तीर्ण परिसर आणि गैरसोयपरिसराचा मनपात समावेश होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला असून, पदाधिकाºयांनी देखील व्यापारी संकुल वा भाजी मार्केटचा ठराव मनपात मांडलेला नाही. कार्यालयातून घरी येताना पालेभाजी व इतर साहित्य खरेदी करून यावे लागते. घर बांधताना परिसर मोकळा असून, प्रदुषण नाही, मनपात गेल्यानंतर लवकरच सुधारणा होईल असे प्रत्येकाला वाटले परंतु भ्रमनिरस झाला आहे.

भूखंडाचा उपयोग करासातारा- देवळाई दोन्ही ग्रामपंचायतीच्या काळात खेळाचे मैदान व उद्यान असे ४६ भुखंडाची नोंद आहे. परंतु बहुतांश भूखंड रिवाईज करून त्याची विक्री झाली आहे. त्याकडे मनपा का लक्ष देत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला जात आहे. परिसरातील ड्रेनेज, रस्ते, लाईट इत्यादी प्रमुख प्रश्नांवर तोडगा काढण्यासही अति संथगतीने काम केले जात आहे. तेव्हा मोकळ्या भुखंडावर व्यापारी संकुल तसेच भाजीमंडई सुरू केल्यास नागरिकांची गैरसोय टळणार आहे, असे रोहण पवार, माजी उपसरपंच राजू नरवडे यांचे म्हणणे आहे.

बेरोजगारांना रोजगार मिळेलशहरात विविध ठिकाणी व्यवसायिक दृष्टिकोनातून व्यापारी संकुल तसेच भाजी मार्केट काढून जनतेला सेवा पुरविण्याचे काम मनपाने केले आहे. परंतु सातारा- देवळाईत मनपाने स्वत:चा ठसा उमटविणारे एकही काम केलेले नाही. बेरोजगारांना व्यवसाय मिळेल अन् नागरिकांना सेवा मिळेल,असे माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल, नामदेव बाजड म्हणाले.