शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सिसरमल गावात वनविभागाच्या जमिनीवर होणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मराठवाडा इको बटालियची स्थापना होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत इको बटालियनने आतापर्यंत ...

औरंगाबाद : मराठवाडा इको बटालियची स्थापना होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत इको बटालियनने आतापर्यंत ७६४ हेक्टर जमिनीत ६ लाख ७६ हजार ५५८ वृक्षांची लागवड केली आहे. हे काम पुढे घेऊन जाण्यासाठी सिरसमल गावातील वनविभागाच्या १५० हेक्टर जमिनीवर वनराई करण्याचा निर्णय इको बटालियनने घेतला आहे. वन विभाग आणि बटालियनच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या जमिनीची पाहणी केली.

वन विभागाच्या जमिनीवर सिरसमल गावच्या काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले होते. तेव्हा गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे घेऊन कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना वन विभाग आणि इको बटालियनच्या अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. मात्र, एकही शेतकरी कागदपत्रे घेऊन आला नाही, असे इको बटालियनने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. इको बटालियनचे कमांड अधिकारी कर्नल एम.ए. खान, प्रकल्प अधिकारी लेफ्टनंट कर्नल मिथिल एस. जयकर, कॅप्टन मेहता हीत आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची नुकतीच पाहणी केली. या जमिनीवर १ लाख ६० वृक्षांचे रोपण होऊ शकते. हे वृक्षारोपण करण्यास इको बटालियन तयार असल्याचेही त्यांनी कळविले आहे. मात्र, या जमिनीवर काही जणांनी अतिक्रमण केले आहे. याविषयीचे पुरावे शेतकऱ्यांना मागण्यात आले होते. त्यांनी ते दिले नाहीत. वन विभागाची ही जमिनी इको बटालियनला देण्यात येणार आहे. त्यानुसार इको बटालियन लवकरच त्यावर वृक्षारोपण करणार असल्याचेही कळविले आहे.

चौकट

गावकऱ्यांशी चर्चा

इको बटालियनचे कमांड अधिकारी कर्नल एम.ए. खान यांनी सिरसमल गावातील नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या, तसेच वन विभागाच्या जमिनीवर होणाऱ्या वृक्षारोपणात अधिकाधिक लोकोपयोगी वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले, तसेच गावातील शेतकरी वर्षात एकदाच पीक घेतात. त्यानंतर मजुरीसाठी इतर ठिकाणी जातात. त्यामुळे वृक्षारोपणासाठी लागणारे मनुष्यबळ हे गावातूनच उपलब्ध केले जाईल. त्यामुळे गावातील अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, असेही कर्नल खान यांनी गावकऱ्यांना सांगितल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.