शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनतस्करांना रान मोकळे

By admin | Updated: August 31, 2014 00:12 IST

किनवट : वनरक्षक-वनपाल संघटनेने आयोजित संपात किनवट, माहूर तालुक्यातील ३०० च्या आसपास वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तस्करांसाठी रान मोकळे झाले.

किनवट : वनरक्षक-वनपाल संघटनेने आयोजित संपात किनवट, माहूर तालुक्यातील ३०० च्या आसपास वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तस्करांसाठी रान मोकळे झाले. दरम्यान, २९ आॅगस्ट रोजी रात्री पानधरा जंगलातील जवळपास १२ सागवान झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीे.वनरक्षक पदाचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे, निश्चित प्रवास भत्ता मिळणे, राज्यसीमा तपासणी नाक्यावर वनपालांची नियुक्ती करणे, वनरक्षक, वनपाल यांना ८ तासांचे काम द्यावे. या व इतर काही मागण्यांसाठी महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना नागपूरने २५ आॅगस्ट -पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात किनवट तालुक्यातील वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तोड व तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या किनवट तालुक्यातील लाकूड चोरट्यांना एकप्रकारे रानच मोकळे झाले आहे. दरम्यान, २९ आॅगस्टच्या रात्री किनवट वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पानधरा जंगलात जवळपास १२ सागवानाची झाडे तोडून माल लांबविल्याची घटन घडली आहे. मात्र अशा आणखी किती अवैध सागवान कटईच्या घटना गेल्या सहा दिवसांत घडल्या असाव्यात हे जंगलात पाहणी केल्यास उघड होईल. वनरक्षक-वनपाल संपावर असतानाच आता वनपरिक्षेत्राधिकारी जंगलात गस्त घालत आहेत. पानधरा जंगलात जवळपास १२ सागवान झाडे तोडून काही माल लांबविला तर काही माल पडून असल्याचे वनक्षेत्रपाल आडे यांनी सांगितले. (वार्ताहर)