शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या जंगलाला आग लागते की लावली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर ...

फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण अशा प्रकारामुळे मात्र जंगल संपदा नष्ट होताना दिसून येत आहे. निधोना परिसरातील जंगलाला आठ वर्षात तब्बल पाच वेळा आग लागल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद वनविभागाचे सिल्लोड व फुलंब्री ही दोन तालुके मिळून एक उपविभागीय कार्यालय सिल्लोड येथे स्थापित आहे. फुलंबी तालुक्यातील वनविभागाची ३,९०० हेक्टर जमिनीची देखभाल करण्याची जबाबदारी सिल्लोड विभागाची आहे. यात निधोना परिसरातील ५७ हेक्टर वनजमिनीचा ताबा हा सोयगाव विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचे निधोना शिवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी निधोन्याचे ५७ हेक्टर जंगल केवळ नावालाच उरले आहे. वनविभागाकडून दरवर्षी देखाव्यापुरती वृक्षलागवड केली जाते. पण त्याच्या संवर्धनाची जबाबदारी मात्र कोणीच घेत नाही. परिणामी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ फासला जात आहे. त्यात स्थानिक पातळीवरदेखील नागरिकांसह विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.

वनविभागाचा तुघलकी निर्णय

फुलंब्री तालुक्यात जंगल असताना यांचा कारभार सिल्लोड किंवा औरंगाबाद विभागाकडे देण्याऐवजी तो सोयगाव विभागाला का जोडला गेला. एक प्रकारे वनविभागाचा हा निर्णय तुघलकी म्हणावा लागेल. ज्यांना देखरेख करण्यास सोयीचे पडेल अशा कार्यालयाकडे अधिकार नसल्याने येथील वनसंपदेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

नुसताच चौकशींचा फार्स

वनविभागाच्या जंगलाला नेहमीच आग लागते. ही आग लावली जाते की अचानक लागते. यावर अनेकवेळा वनविभागाकडून चौकशीचा फार्स लावला जातो. पण अद्यापपर्यंत कोणतेही ठोस उत्तर सापडले नाही. आगीसंदर्भातील हा गहन प्रश्न असून, हे कायमस्वरूपी न उलगडणारे कोडे आहे. त्यात आग लागली नाही तर दरवर्षी वृक्षलागवडीसाठी लागणारी बिले कशी निघतील, असा प्रश्नही काही पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

वन्यप्राणी निघतात पाण्याच्या शोधात

निधोना परिसरातील जंगलात नीलगाय, हरीण, रानडुकर, सायाळ या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. या जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने हे प्राणी जंगलाबाहेर पडू लागतात. पाण्याच्या शोधात वाडीवस्तीवर जातात. परिणामी नागरिकांकडून भीतीपोटी वन्यप्राण्यांवर हल्ला केला जातो. त्यामुळे वन्यप्राणीदेखील संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.