शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

वनविभागाच्या जंगलाला आग लागते की लावली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर ...

फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण अशा प्रकारामुळे मात्र जंगल संपदा नष्ट होताना दिसून येत आहे. निधोना परिसरातील जंगलाला आठ वर्षात तब्बल पाच वेळा आग लागल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद वनविभागाचे सिल्लोड व फुलंब्री ही दोन तालुके मिळून एक उपविभागीय कार्यालय सिल्लोड येथे स्थापित आहे. फुलंबी तालुक्यातील वनविभागाची ३,९०० हेक्टर जमिनीची देखभाल करण्याची जबाबदारी सिल्लोड विभागाची आहे. यात निधोना परिसरातील ५७ हेक्टर वनजमिनीचा ताबा हा सोयगाव विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचे निधोना शिवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी निधोन्याचे ५७ हेक्टर जंगल केवळ नावालाच उरले आहे. वनविभागाकडून दरवर्षी देखाव्यापुरती वृक्षलागवड केली जाते. पण त्याच्या संवर्धनाची जबाबदारी मात्र कोणीच घेत नाही. परिणामी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ फासला जात आहे. त्यात स्थानिक पातळीवरदेखील नागरिकांसह विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.

वनविभागाचा तुघलकी निर्णय

फुलंब्री तालुक्यात जंगल असताना यांचा कारभार सिल्लोड किंवा औरंगाबाद विभागाकडे देण्याऐवजी तो सोयगाव विभागाला का जोडला गेला. एक प्रकारे वनविभागाचा हा निर्णय तुघलकी म्हणावा लागेल. ज्यांना देखरेख करण्यास सोयीचे पडेल अशा कार्यालयाकडे अधिकार नसल्याने येथील वनसंपदेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

नुसताच चौकशींचा फार्स

वनविभागाच्या जंगलाला नेहमीच आग लागते. ही आग लावली जाते की अचानक लागते. यावर अनेकवेळा वनविभागाकडून चौकशीचा फार्स लावला जातो. पण अद्यापपर्यंत कोणतेही ठोस उत्तर सापडले नाही. आगीसंदर्भातील हा गहन प्रश्न असून, हे कायमस्वरूपी न उलगडणारे कोडे आहे. त्यात आग लागली नाही तर दरवर्षी वृक्षलागवडीसाठी लागणारी बिले कशी निघतील, असा प्रश्नही काही पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

वन्यप्राणी निघतात पाण्याच्या शोधात

निधोना परिसरातील जंगलात नीलगाय, हरीण, रानडुकर, सायाळ या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. या जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने हे प्राणी जंगलाबाहेर पडू लागतात. पाण्याच्या शोधात वाडीवस्तीवर जातात. परिणामी नागरिकांकडून भीतीपोटी वन्यप्राण्यांवर हल्ला केला जातो. त्यामुळे वन्यप्राणीदेखील संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.