शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वनविभागाच्या जंगलाला आग लागते की लावली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर ...

फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण अशा प्रकारामुळे मात्र जंगल संपदा नष्ट होताना दिसून येत आहे. निधोना परिसरातील जंगलाला आठ वर्षात तब्बल पाच वेळा आग लागल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद वनविभागाचे सिल्लोड व फुलंब्री ही दोन तालुके मिळून एक उपविभागीय कार्यालय सिल्लोड येथे स्थापित आहे. फुलंबी तालुक्यातील वनविभागाची ३,९०० हेक्टर जमिनीची देखभाल करण्याची जबाबदारी सिल्लोड विभागाची आहे. यात निधोना परिसरातील ५७ हेक्टर वनजमिनीचा ताबा हा सोयगाव विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचे निधोना शिवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी निधोन्याचे ५७ हेक्टर जंगल केवळ नावालाच उरले आहे. वनविभागाकडून दरवर्षी देखाव्यापुरती वृक्षलागवड केली जाते. पण त्याच्या संवर्धनाची जबाबदारी मात्र कोणीच घेत नाही. परिणामी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ फासला जात आहे. त्यात स्थानिक पातळीवरदेखील नागरिकांसह विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.

वनविभागाचा तुघलकी निर्णय

फुलंब्री तालुक्यात जंगल असताना यांचा कारभार सिल्लोड किंवा औरंगाबाद विभागाकडे देण्याऐवजी तो सोयगाव विभागाला का जोडला गेला. एक प्रकारे वनविभागाचा हा निर्णय तुघलकी म्हणावा लागेल. ज्यांना देखरेख करण्यास सोयीचे पडेल अशा कार्यालयाकडे अधिकार नसल्याने येथील वनसंपदेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

नुसताच चौकशींचा फार्स

वनविभागाच्या जंगलाला नेहमीच आग लागते. ही आग लावली जाते की अचानक लागते. यावर अनेकवेळा वनविभागाकडून चौकशीचा फार्स लावला जातो. पण अद्यापपर्यंत कोणतेही ठोस उत्तर सापडले नाही. आगीसंदर्भातील हा गहन प्रश्न असून, हे कायमस्वरूपी न उलगडणारे कोडे आहे. त्यात आग लागली नाही तर दरवर्षी वृक्षलागवडीसाठी लागणारी बिले कशी निघतील, असा प्रश्नही काही पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

वन्यप्राणी निघतात पाण्याच्या शोधात

निधोना परिसरातील जंगलात नीलगाय, हरीण, रानडुकर, सायाळ या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. या जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने हे प्राणी जंगलाबाहेर पडू लागतात. पाण्याच्या शोधात वाडीवस्तीवर जातात. परिणामी नागरिकांकडून भीतीपोटी वन्यप्राण्यांवर हल्ला केला जातो. त्यामुळे वन्यप्राणीदेखील संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.