शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

आपतकालीन सुरक्षितेसाठी वन विभागाकडे अधुनिक साधनेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:05 IST

औरंगाबाद: आपतकालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी वन विभागाकडे आधुनिक साधनेच नाहीत. सातारा डोंगरावर लागलेली आग विझवतांना वन विभागाला कराव्या लागलेल्या ...

औरंगाबाद: आपतकालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी वन विभागाकडे आधुनिक साधनेच नाहीत. सातारा डोंगरावर लागलेली आग विझवतांना वन विभागाला कराव्या लागलेल्या कसरतीमधून हे विदारक सत्य समोर आले. सायंकाळी लागलेली आग आग्निशामक विभाग तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने जुन्याच पद्धतीने पहाटे पहाटे आटोक्यात आणली.

एकीकडे झाडे लावा झाडे जगवा, असा नारा द्यायचा आणि आपतकाली आवश्यक आधुनिक साधने मात्र उपलब्ध करून दिली जात नाहीत. सातारा, देवळाई, जटवाडा, माळीवाडा तसेच जिल्हाभरातील विविध ठिकाणी जंगलाला जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आग लागण्याचे प्रकार घडतात. त्यावेळी वन कर्मचारी, अधिकारी झाडाच्या फांद्यांने किंवा जुन्याच पद्धतीने आगीवर तुटुन पडतात. डोंगरातील वनराई वाचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेली कोणतीही साधणे वन विभागाकडेही नाही आणि अग्निशामक विभागाकडेही नाही. बुट तसेच इतर सुरक्षेचे कोणतेही साधण नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले. औरंगाबाद शेजारी उजाड असलेली डोंगर हळुहळु वनराईने हिरवीगार दिसत आहेत. त्यामुळे अन्नसाखळी पूर्ण होत असल्याने येथे मोर, तितर, चिमण्या, साळुंकी तसेच हरिण, रानडुक्कर, तडस, बिबटे इतर पशु पक्षी विहार करत आहेत. आगीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यापासून ते पशु पक्षांना फटका बसला आहे. त्यांची घरटी आगीत भष्मसात झाली. आधुनिक साधणे विभागाकडे उपलब्ध असती तर रात्रभर प्रयत्नाऐवजी लवकर आगीवर नियंत्रण मिळविता आले असते.

जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

शासनाने जंगल वाचविण्यासाठी आधुनिक साधणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे पत्र नुकतेच शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना दिले आहे.- डॉ. किशोर पाठक (निसर्ग प्रेमी)

फायर फट्टे व साधणाचा पाठविला प्रस्ताव

झुंज देण्यासाठी फायर फट्टे तसेच नव-नवीन साधणे उपलब्ध करून द्यावी. अग्निशामक विभागाकडे अधिक लांबीचा पाईप उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - शशिकांत तांबे (वन परिक्षेत्र अधिकारी)