शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून जळतेय जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:04 IST

फुलंब्री : तालुक्यातील निधोना हद्दीतील जंगलाला आग लागून आठ दिवस झाले. पण एकही अधिकारी त्याकडे फिरकला नसल्याने दोन हरणाचा ...

फुलंब्री : तालुक्यातील निधोना हद्दीतील जंगलाला आग लागून आठ दिवस झाले. पण एकही अधिकारी त्याकडे फिरकला नसल्याने दोन हरणाचा होरपळून मृत्यू झाला तर २४ हेक्टर क्षेत्रातील झाडे जळून खाक झाली आहेत. मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत असतानासुद्धा जबाबदार अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे.

फुलंब्री तालुक्यातील निधोना व कन्नड तालुक्यातील दरेगाव या दोन गावांच्या मध्यभागी असलेल्या गट २६० मध्ये वनविभागाचे ५७ हेक्टर क्षेत्रात जंगल आहे. या जंगलात नीलगाय, हरीण, रानडुक्कर आदी प्राणी असून जंगलाचा काही भाग डोंगरावर तर काही सपाट जमिनीवर आहे. निधोना परिसरातील ५७ हेक्टरपैकी सुमारे २४ हेक्टर क्षेत्रातील जंगलाला १ मेपासून आग लागलेली असून ती ७ मेपर्यंत सुरूच आहे. मात्र, वनविभागाचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत असून वनसंपदा नष्ट होत असताना ते याकडे कानाडोळा करत आहेत. या आगीमुळे जंगलातील दोन हरिणीचा होरपळून मृत्यू झाला असून कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले आहे. जंगलातील आग परिसरात पसरत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या आगीत हरिदास राऊतराय, देवीदास राऊतराय, गंगाराम सोनवणे, रंगनाथ सोनवणे यांच्या शेतातील आंब्याची झाडे, मक्काचा चारा, प्लास्टिकचे पाईप जळाले आहेत.

---- कोट ------

निधोना हद्दीतील वन विभागाच्या या जंगलाला गेल्या आठ दिवसांपासून आग लागलेली आहे. यामुळे अनेक वन्यप्राणी आपला जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले. परंतु, जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे.

-- बिजूबाई राऊतराय, सरपंच निधोना

----- कॅप्शन : निधोना परिसरातील जंगलास लागलेल्या आगीत वनसंपदा अशी नष्ट होत आहे.