शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कापड व्यावसायिकांची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कापड व्यावसायिकांची आर्थिक घडी मोडली आहे. १ जूनपासून दुकाने उघडली नाहीत तर भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कापड व्यावसायिकांची आर्थिक घडी मोडली आहे. १ जूनपासून दुकाने उघडली नाहीत तर भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने येत्या काळात २५० पेक्षा अधिक लहान दुकानदार दुकाने खाली करतील. जिल्ह्यात ३ हजार कापड दुकाने असून, त्यावर ५० हजार कर्मचारी अवलंबून आहेत. या सर्वांचा जगण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

कापड व्यापाऱ्यांसाठी मार्च ते मे हा काळ महत्त्वाचा असतो. याच काळात लग्नसराई, गुढीपाडवा, अक्षयतृतीया व रमजान ईद हे महत्त्वाचे सण येतात. त्याशिवाय भगवान महावीर जन्मोत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कपड्यांची विक्री होते. उन्हाळा असल्याने व्यापाऱ्यांनी फेब्रुवारीत कॉटन व अन्य कपडे मागविले होते. देशभरातून नवीन फॅशनेबल कोट्यवधीचे कपडे शहरात दाखल झाले होते. त्यातील ९० टक्के कपडे पडून आहेत.

दोन महिन्यांपासून शोरूम बंद असल्याने कपड्यांची घडी मोडता आली नाही. यामुळे कपड्यांवर धूळ साठणे, ते फिके पडणे, घडीवर धुळीची रेष उमटणे असे नुकसान झाले आहे. याशिवाय उंदीर, घुशींनी कपड्यांचे काय हाल केले असतील हे आता दुकाने उघडल्यावरच समजणार आहे. कापड व्यापारी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिथे उलाढाल अधिक असते त्या दुकानात कर्मचाऱ्यांना कमिशन दिले जाते. ते कमिशनही बुडाले. एकूणच संपूर्ण कापड व्यवसाय ‘आर्थिक संकटात’ सापडला आहे. १ जूनपासून दररोज ४ ते ८ तास शोरूम उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कापड व्यापारी संघटनेतर्फे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

चौकट

हातगाडीसमोर १० ते १५ लोक उभे असतात. तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत नाही. मात्र, १० हजार स्केअर फुटच्या शोरूममध्ये १० ग्राहक अंतर ठेवून व सर्व सरकारी नियम पाळून बसले तरी त्यामुळे कसा काय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, असा सवाल कापड व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

(चौकट )

५० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न

जिल्ह्यात लहान मोठी ३ हजार कापड दुकाने आहेत. त्यातील १५०० दुकाने शहरात आहेत. यावर ५० हजार कर्मचारी व त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. लॉकडाऊन वाढले तर कर्मचाऱ्यांचा पगार कुठून देणार. कारण, आता व्यापारीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुकाने उघडली नाहीत तर लहान मध्यम आकारातील २५० पेक्षा जास्त दुकाने बंद पडतील.

विनोद लोया

अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

--

कोट्यवधींचे कपडे पुढील वर्षापर्यंत सांभाळावे लागणार

उन्हाळ्यासाठी नवीन फॅशनेबल कॉटनचे कपडे ऑर्डर देऊन मागविले होते. लॉकडाऊनमुळे हे कोट्यवधींचे कपडे पुढील हंगामात विक्री करावे लागतील. तोपर्यंत नवीन फॅशन येते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे ईद सण होता. मात्र, तो व्यवसाय बुडाला. आम्ही उलाढालीत ४ वर्षे मागे फेकले गेलो आहोत. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढील ४ ते ५ वर्षे लागतील.

हरमीतसिंग, संचालक, ट्रेंझ

---

पाणी डोक्यावरून गेले

२ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मागील वर्षातील दोन ते तीन महिने सोडले तर लॉकडाऊनच होते. किती दिवस घरी बसून राहणार. व्यापारी कर्जात व विविध विमाच्या हप्त्यात एवढा बुडाला आहे की, आता पाणी डोक्यावरून गेले आहे. दुकान उघडण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही.

किशोर काल्डा

संचालक, राजदरबार

---

१ जूनपासून शोरूम उघडणे आवश्यक

आता कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी झाली आहे. यामुळे सरकारी नियम पाळत १ जूनपासून कपड्यांचीच नव्हे तर सर्व दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी. तसे न केल्यास कापड व्यावसायिकांना विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करणे अत्यंत अवघड होऊन बसेल. कारण, व्यावसायिक वाचले तरच देशाची अर्थव्यवस्था वाचेल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

संदीप अग्रवाल

संचालक, आकर्षण