शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चारा वाहतुकीस जिल्ह्याबाहेर बंदी

By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST

जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले

जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जालना तहसील कार्यालयात संभाव्य टंचाई आढावा बैठक घेतली.यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत लघू तसेच मध्यम प्रकल्पांत १७ टक्केच पाणीसाठा आहे. ६४ पैकी ५ प्रकल्प कोरडेठाक आहेत. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे अनेक गावात पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश गावांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागेल अशी भीती सर्वदूर व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याने भीषण दुष्काळ अनुभवला होता. यंदाही तिच परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. विशेषत: जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. विहिरी व कूपनलिकांमधील पाणी पातळी घटली आहे. यामुळे रबी पेरणीही धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत पशुधनही कमी झाले आहे. फेबु्रवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी केली असून त्यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी काढले.संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर पूर्वनियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी नायक यांनी आज सकाळी जालना तालुक्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेतला. यानिमित्त येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा, तहसीलदार रेवननाथ लबडे यांची उपस्थिती होती.सर्व जलसाठ्यांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडल्या, त्या सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे ज्या योजना बंद आहेत, त्याबाबत महावितरणने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ७ मध्यम तर ५७ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत २६ टक्के तर लघू मध्ये १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी मध्यम मध्ये २ नोव्हेंबर २०१३ पर्यंत ५९ तर लघू मध्ये ४६ टक्के पाणीसाठा होता. सध्या सर्व प्रकल्प मिळून केवळ १७ टक्के पाणी आहे. ५७ लघू प्रकल्पांपैकी ४ कोरडेठाक तर तब्बल २४ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याच्याखाली आहे. ४जिल्हाधिकारी नायक हे स्वत: संभाव्य टंचाईसंदर्भात तालुकानिहाय आढावा बैठका घेणार असून त्यात तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.