शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

चारा संपला, प्रशासन सुस्त !

By admin | Updated: July 12, 2015 00:45 IST

हरी मोकाशे ,लातूर गेल्या वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि यंदा पावसाने दडी मारल्याने पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेला

हरी मोकाशे ,लातूरगेल्या वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि यंदा पावसाने दडी मारल्याने पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेला ७ लाख ८२ हजार ६४७ मे़ टन चारा संपुष्टात आला आहे़ परिणामी, पशूधनाच्या दावणीला ऊसाचे वाळलेले पाचट टाकले जात आहे़ जीवापाड सांभाळलेले पशूधन आता जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न पशूपालकांसमोर असताना जिल्हा प्रशासन मात्र सुस्त असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूधन संख्या घटण्याची भिती व्यक्त होत आहे़जिल्ह्यात गेल्या वर्षी विलंबाने व अल्प पर्जन्यमान झाले़ त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम अपेक्षितरित्या साधला नाही़ रबी तरी पदरी पडेल अशी शेतकऱ्यांनी आशा होती़ परंतु, वरुणराजाने पाठ फिरविल्याने त्या आशेवर पाणी फिरले़ पाऊसच नसल्याने रबी हंगामातून दरवर्षीच्या तुलनेत अल्प चारा उपलब्ध झाला़ तो म्हणजे केवळ १ लाख ५ हजार ३०१ मे़ टन होय़ जिल्ह्यात लहान पशूधनाची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ तर मोठ्या पशूधनाची संख्या ४ लाख ५५ हजार २१८ अशी आहे़जिल्ह्यातील पशूधनास दररोज ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ जिल्ह्यास वार्षिक चारा ११ लाख ३९ हजार ७९७ मे़ टन लागतो़ त्याच्या तुलनेत जिल्ह्यात उन्हाळ्याचा अखेरपर्यंत केवळ ७ लाख ८२ हजार ६४७ मे़ टन चारा उपलब्ध झाला होता़ यंदा वेळेवर पाऊस होईल, या आशेने पशूपालकांनी भर उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पशूधन सांभाळले़ मृग नक्षत्राच्या प्रारंभी उदगीर, जळकोट, रेणापूर या तालुक्यांत पावसाच्या चांगल्या सरी झाल्या़ जिल्ह्यात जून अखेरपर्यंत सरासरी ८७़५८ मिमी पाऊस झाला तर जुलैत आजपर्यंत ८़८२ मिमी झाला आहे़दरवर्षी जुलैमध्ये माळराने हिरवीगार दिसतात़ परंतु, यंदा पाऊसच नसल्याने माळराने ओसाड दिसून येत आहेत़ त्यामुळे पशूधनास हिरवा चारा उपलब्ध नाही़ कडबाही संपुष्टात आल्याने पशूपालक धास्तावला आहे़ जीवापाड सांभाळलेले पशूधन आता कसे जगवायचे असा प्रश्न सतावत आहे़ जिल्हा प्रशासन मात्र कुठलीही ठोस उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, जिल्ह्यातील पशूधन संख्या घटण्याची भिती व्यक्त होत आहे़चारा संपुष्टात आला आहे़ त्यामुळे पशूपालक चिंतातूर झाले आहे़ चारा छावणी संदर्भात प्रस्ताव महसूलच्या अधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात येत आहेत, असे पशूसंवर्धन विकास अधिकारी डॉ़ एल़ एस़ पवार यांनी सांगितले़