शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

चाऱ्याचा निधी टंचाईकडे वर्ग

By admin | Updated: October 26, 2015 00:01 IST

लातूर : मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या पाचही चारा छावण्या अवघ्या दोन महिन्यांत बंद केल्या आहेत़

लातूर : मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या पाचही चारा छावण्या अवघ्या दोन महिन्यांत बंद केल्या आहेत़ परिणामी, चारा छावणीसाठी आलेला ४४ कोटींपैकी ३८ कोटींचा निधी टंचाई निवारणासाठी वर्ग करण्यात आला आहे़ केवळ चारा छावण्यांसाठी २६ लाखांचा निधी आतापर्यंत खर्ची केला असून, ५ कोटी ७४ लाख रुपये चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने आपल्या कोषात ठेवले आहेत़जिल्ह्यात ५ लाख १५० लहान-मोठ्या जनावरांची संख्या आहे़ त्यापैकी ३ लाख ३२५ दुधाळ जनावरे आहेत़ त्यात २ लाख ३२ हजार ५८४ गायी, म्हशी आहेत़ उर्वरीत शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे़ ५ लाख १५० पशुधनाला दिवसाला ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ मात्र जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ चाऱ्याच्या बाबतीत जिल्हा निरंक आहे़ तरीही जिल्ह्यातील पाचही चारा छावण्या बंद पडल्या आहेत़ या पशुधनाला ३ हजार १६६ किलो दररोज चारा लागतो़ परंतु सध्या चाराही नाही आणि छावण्याही नाहीत़ यामुळे पशुपालकांची अडचण झाली आहे़ आशिव, माळकोंडजी, तुपडी, रुदा आणि औसा तालुक्यातील एकंबी येथे चारा छावण्या सुरु होत्या़ परंतु या छावण्यात पशुधन येत नसल्यामुळे त्या बंद आहेत़ चारा छावण्या सुरु करण्यासाठी असणाऱ्या अटी जाचक होत्या़ त्यामुळे केवळ पाच छावण्या सुरु झाल्या़ त्याही बंद पडल्या आहेत़ त्यामुळे प्रशासनाने आलेल्या ४४ कोटीच्या निधीतून केवळ २६ लाखांचा खर्च केला असून, ५ कोटी ७४ लाखांचा निधी चाऱ्यासाठी राखून ठेवला आहे़ उर्वरित ३८ कोटींचा निधी शासनाकडे परत पाठवून टंचाई निवारणासाठी हा निधी वापरण्याची परवानगी मागितली होती़ शासनाने गेल्या दोन दिवसापूर्वी हा निधी टंचाई निवारणासाठी वर्ग करुन दिला आहे़ चारा छावण्याच्या जाचक अटी लक्षात घेता पशुधनाच्या दावण्यांना चारा देण्यात यावा किंवा निधी देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक पशुपालकांनी प्रशासनाकडे केली आहे़ मात्र या मागणीकडे सध्या तरी दुर्लक्षच आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, शिरुर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट या दहाही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही़४जिल्ह्यात तुपडी, रुदा, एकंबी, माळकोंडजी आणि आशिव येथे छावण्या सुरु झाल्या तेव्हा ६५० लहान-मोठी जनावरे होती़ मात्र महिनाभरापूर्वी पशुपालकांनी ही जनावरे परत नेली़ त्यामुळे या छावण्या बंद झाल्या आहेत़ आतापर्यत झालेला त्यावरचा खर्च संबंधीत छावणी चालकांना दिला असून, चाऱ्यासाठी काही निधी यातला राखीव ठेवला आहे़ उर्वरित निधी टंचाईसाठी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली़