शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याचा निधी टंचाईकडे वर्ग

By admin | Updated: October 26, 2015 00:01 IST

लातूर : मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या पाचही चारा छावण्या अवघ्या दोन महिन्यांत बंद केल्या आहेत़

लातूर : मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या पाचही चारा छावण्या अवघ्या दोन महिन्यांत बंद केल्या आहेत़ परिणामी, चारा छावणीसाठी आलेला ४४ कोटींपैकी ३८ कोटींचा निधी टंचाई निवारणासाठी वर्ग करण्यात आला आहे़ केवळ चारा छावण्यांसाठी २६ लाखांचा निधी आतापर्यंत खर्ची केला असून, ५ कोटी ७४ लाख रुपये चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने आपल्या कोषात ठेवले आहेत़जिल्ह्यात ५ लाख १५० लहान-मोठ्या जनावरांची संख्या आहे़ त्यापैकी ३ लाख ३२५ दुधाळ जनावरे आहेत़ त्यात २ लाख ३२ हजार ५८४ गायी, म्हशी आहेत़ उर्वरीत शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे़ ५ लाख १५० पशुधनाला दिवसाला ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ मात्र जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ चाऱ्याच्या बाबतीत जिल्हा निरंक आहे़ तरीही जिल्ह्यातील पाचही चारा छावण्या बंद पडल्या आहेत़ या पशुधनाला ३ हजार १६६ किलो दररोज चारा लागतो़ परंतु सध्या चाराही नाही आणि छावण्याही नाहीत़ यामुळे पशुपालकांची अडचण झाली आहे़ आशिव, माळकोंडजी, तुपडी, रुदा आणि औसा तालुक्यातील एकंबी येथे चारा छावण्या सुरु होत्या़ परंतु या छावण्यात पशुधन येत नसल्यामुळे त्या बंद आहेत़ चारा छावण्या सुरु करण्यासाठी असणाऱ्या अटी जाचक होत्या़ त्यामुळे केवळ पाच छावण्या सुरु झाल्या़ त्याही बंद पडल्या आहेत़ त्यामुळे प्रशासनाने आलेल्या ४४ कोटीच्या निधीतून केवळ २६ लाखांचा खर्च केला असून, ५ कोटी ७४ लाखांचा निधी चाऱ्यासाठी राखून ठेवला आहे़ उर्वरित ३८ कोटींचा निधी शासनाकडे परत पाठवून टंचाई निवारणासाठी हा निधी वापरण्याची परवानगी मागितली होती़ शासनाने गेल्या दोन दिवसापूर्वी हा निधी टंचाई निवारणासाठी वर्ग करुन दिला आहे़ चारा छावण्याच्या जाचक अटी लक्षात घेता पशुधनाच्या दावण्यांना चारा देण्यात यावा किंवा निधी देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक पशुपालकांनी प्रशासनाकडे केली आहे़ मात्र या मागणीकडे सध्या तरी दुर्लक्षच आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, शिरुर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट या दहाही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही़४जिल्ह्यात तुपडी, रुदा, एकंबी, माळकोंडजी आणि आशिव येथे छावण्या सुरु झाल्या तेव्हा ६५० लहान-मोठी जनावरे होती़ मात्र महिनाभरापूर्वी पशुपालकांनी ही जनावरे परत नेली़ त्यामुळे या छावण्या बंद झाल्या आहेत़ आतापर्यत झालेला त्यावरचा खर्च संबंधीत छावणी चालकांना दिला असून, चाऱ्यासाठी काही निधी यातला राखीव ठेवला आहे़ उर्वरित निधी टंचाईसाठी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली़