शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

मुंडे यांच्यावर विसंबून होते भावी राजकारण

By admin | Updated: June 6, 2014 01:02 IST

सतीश जोशी, परभणी- केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंंडे यांच्या जाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे.

सतीश जोशी, परभणीकेंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंंडे यांच्या जाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याचे राजकारण बदलण्याची चिन्हे दिसत होती, तशा हालचालीही सुरू झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांची जरी वंजारी समाजाचे दैवत म्हणून ओळख असली तरी मुंडे यांचा आपल्या समाजाप्रमाणेच इतर जातीधर्मावरही चांगला प्रभाव होता. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात वंजारी समाजाप्रमाणे ओबीसी मतदारांचाही प्रभाव आहे. निवडणूक विधानसभा, लोकसभेची असो की नगर परिषद, जिल्हा परिषदेची. मुंडे यांच्या एका सभेमुळे वातावरण बदलत असे. हा मतदार भाजपा-शिवसेना महायुतीकडे वळविताना त्यांनी जातपात, नात्यागोत्याच्या राजकारणालाही थारा दिला नव्हता. त्यांच्या समाजात तर मुंडे सांगतील हीच पूर्वदिशा असे. मुंडे यांनी परळीप्रमाणेच गंगाखेडलाही जीव लावलाच नाही तर या मतदार संघात भाजपाचे अस्तित्व जिवंत ठेवले. गंगाखेडमध्ये वंजारा समाजासोबत हटकर, धनगर समाजालाही बरोबरीने सोबत घेऊन भाजपा - शिवसनेची ताकद निर्माण केली होती. मुंडे यांनी गंगाखेड येथे तर ग्रामपंचायत निवडणुकीपासून पालिका, जि. प. आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची ताकद बाळगणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तयार केले होते. आज या मंडळीचा आत्मविश्वास हा मुंडे यांच्या जाण्यामुळे डळमळीत झाला आहे. असाच प्रभाव त्यांचा जिंतूर तालुक्यातील वंजारी आणि ओबीसी समाजावर होता. जिंतूर मतदार संघात असलेली ही गठ्ठा मते तालुक्यातील निवडणुकीची दिशा बदलत होती. नुकत्याच झालेल्या परभणी लोकसभा निवडणुकीत जिंतूरचे काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडचे आ. सीताराम घनदाट, राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी उघडउघड शिवसेनेचे उमेदवार खा. बंडू जाधव यांचा प्रचार करून शिवसेनेच्या विजयास हातभार लावला होता. संपूर्ण भारतात जरी नरेंद्र मोदी यांची लाट होती तरी परभणी लोकसभा मतदार संघात या लाटेला गती देण्याचे काम निश्चितच या मंडळीनी केले. त्यांची ही कृती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणाला कदाचित वळण देणारीही ठरली असती. हे सर्व बदलते राजकारण गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना केंद्रबिंदू माणून वळणावर होते. लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने तर आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि गोपीनाथ मुंडे यांचा अनेकदा सुसंवादही झाला होता. या न त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांची जवळीक वाढत चालली होती. कारण जिंतूर विधानसभा मतदारसंघात असलेले वंजारा समाजाचे गठ्ठा मतदान मुंडे यांच्या आशीर्वादाने कॅश करण्याचा बोर्डीकर यांचा हा प्रयत्न होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकतर्फी यशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेते मंडळीही विचलित झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे हे जिल्ह्यातील राजकारण बदलतील, अशी चिन्हे आणि चर्चा चालू असतानाच मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे या बदलत्या राजकारणाबद्दल प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.