शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागल्यावर मराठा आंदोलनावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न ...

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न एकदा मार्गी लागल्यावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी लोकमतला दिली.

मराठा समाजाच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाला एक महिना मुदत देत संभाजीराजे यांनी मूक आंदोलन पुढे ढकलले होते. ही मुदत संपण्याच्या २ दिवस आधी १५ जुलै रोजी खा. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आणि आंदोलनाचा इशारा दिला होता.

१७ जून रोजी मुंबईत आंदोलक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि अन्य अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने सत्कारात्मक प्रतिसाद दर्शविला होता. यावेळी मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अवधी मागितला होता. राज्य शासनाच्या विनंतीनुसार मूक आंदोलन एक महिना स्थगित केले होते. ही मुदत १७ जुलै रोजी समाप्त झाली. एक महिन्याच्या मुदतीनंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. या पार्श्वभूमीवर खा. संभाजी राजे यांनी १५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. याविषयी खा. संभाजीराजे यांनी सांगितले की, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर बऱ्यापैकी कार्यवाही सुरू केली. सध्या पूरग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणसांच्या जीवापेक्षा काहीही मोठे नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागल्यावर मराठा आंदोलनाचा विषय हाती घेणार आहे.

---------------------

कोट

९ ऑगस्टपूर्वी राज्यव्यापी बैठक

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्टपूर्वी राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.

- आप्पासाहेब कुढेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबाद.