शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागल्यावर मराठा आंदोलनावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न ...

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न एकदा मार्गी लागल्यावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी लोकमतला दिली.

मराठा समाजाच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाला एक महिना मुदत देत संभाजीराजे यांनी मूक आंदोलन पुढे ढकलले होते. ही मुदत संपण्याच्या २ दिवस आधी १५ जुलै रोजी खा. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आणि आंदोलनाचा इशारा दिला होता.

१७ जून रोजी मुंबईत आंदोलक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि अन्य अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने सत्कारात्मक प्रतिसाद दर्शविला होता. यावेळी मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अवधी मागितला होता. राज्य शासनाच्या विनंतीनुसार मूक आंदोलन एक महिना स्थगित केले होते. ही मुदत १७ जुलै रोजी समाप्त झाली. एक महिन्याच्या मुदतीनंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. या पार्श्वभूमीवर खा. संभाजी राजे यांनी १५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. याविषयी खा. संभाजीराजे यांनी सांगितले की, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर बऱ्यापैकी कार्यवाही सुरू केली. सध्या पूरग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणसांच्या जीवापेक्षा काहीही मोठे नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागल्यावर मराठा आंदोलनाचा विषय हाती घेणार आहे.

---------------------

कोट

९ ऑगस्टपूर्वी राज्यव्यापी बैठक

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्टपूर्वी राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.

- आप्पासाहेब कुढेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबाद.