शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

स्मार्ट सिटी योजनेत आयटी सिटीवर फोकस

By admin | Updated: September 8, 2015 00:39 IST

औरंगाबाद : केंद्र स्मार्ट सिटी अभियानात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) वर फोकस राहणार आहे. मनपा प्रशासनाने याच दृष्टीने स्मार्ट सिटीच्या आराखड्याचे नियोजन करावे,

औरंगाबाद : केंद्र स्मार्ट सिटी अभियानात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) वर फोकस राहणार आहे. मनपा प्रशासनाने याच दृष्टीने स्मार्ट सिटीच्या आराखड्याचे नियोजन करावे, अशा सूचना हैदराबाद येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अभियानाच्या विषयावर हैदराबाद येथे दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन आणि जिल्हाधिकारी निधी पांडे या कार्यशाळेस हजर आहेत. दोन्हीही अधिकारी रविवारीच हैदराबादेत पोहोचले आहेत. या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आयटी सिटीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियानासाठी औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. या शहरांना पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व शहरांकडून त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हैदराबाद येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत स्मार्ट सिटीचे नियोजन कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. शंभर शहरांचे महापौर, आयुक्तांचा समावेश हैदराबादेतील कार्यशाळेसाठी स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेल्या शंभर शहरांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार या शहरांचे महापौर, मनपा आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कार्यशाळेस उपस्थित आहेत. औरंगाबादचे महापौर त्र्यंबक तुपे हे मात्र तब्येत बरी नसल्यामुळे कार्यशाळेला गेलेले नाहीत.