शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सिंचन, आरोग्यसह पायाभूत सुविधांवर भर

By admin | Updated: March 15, 2015 00:33 IST

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९७४ ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. तेव्हापासून ते आजतागायत राजकारणात सक्रीय सहभाग आहेत. आता येथीलच राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. सिंचन, आरोग्यसह पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाचे येथे भरीव काम झाले आहे. दरम्यान, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच तेर येथे पहिल्यांदा विशेष बाब म्हणून ग्रामिण रुग्णालय उभारले गेले. त्यापूर्वी ग्रामिण रुग्णालय केवळ तालुका ठिकाणीच उभारण्यात येत असत. या रुग्णालयासाठी डॉ. पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन दिली. याबरोबरच तेरमध्ये चांगल्या प्रकारचे बसस्थानकही डॉ. पाटील यांच्यामुळेच उभे राहू शकले. गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्या माध्यमातून या क्षेत्राततही लक्षवेधी काम झाल्याचे दिसून येते. तेरणा धरणातून गावाच्या पाईपलाईनव्दारे गावात पाणी पुरवठा करण्यात येतो. या बरोबरच १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सोयही गावात उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राणाजगजितसिंह पाटील हे निवडून आले आहेत. यापूर्वी राज्यमंत्री असताना तेरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना उभाण्यात त्यांना यश आले. यामुळे कॅनॉलद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा हेतू होता. मात्र मागील दोन पावसाळे कोरडे गेल्याने पुरेशा पाण्याअभावी या योजनेचा सध्या लाभ होत नाही. गावामध्ये संत गोरोबा काकांचे राहते घर, बौद्ध स्तूप यांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आणणे, गोरोबा काका यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी व मंदिराला ‘ब’ दर्जा मिळण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. तेरणा नदीवर (शिरपूर पॅटर्न) सरळीकरण व खोलीकरणाचेही मोठे काम करण्यात त्यांना यश आले आल्याचे गावात फेरफटका मारला असता दिसून येते. विविध विकासकामे करण्यात यश आले असले तरी, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. गावातील काही भागात आजही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून व्यापारी संकुलाची उभारणी करावी अशी मागणी असली तरी मुबलक गाळे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.