शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
4
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
5
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
6
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
7
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
8
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
9
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
10
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
11
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
12
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
13
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
14
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
15
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
16
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
17
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
18
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
19
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

सिंचन, आरोग्यसह पायाभूत सुविधांवर भर

By admin | Updated: March 15, 2015 00:33 IST

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९७४ ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. तेव्हापासून ते आजतागायत राजकारणात सक्रीय सहभाग आहेत. आता येथीलच राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. सिंचन, आरोग्यसह पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाचे येथे भरीव काम झाले आहे. दरम्यान, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच तेर येथे पहिल्यांदा विशेष बाब म्हणून ग्रामिण रुग्णालय उभारले गेले. त्यापूर्वी ग्रामिण रुग्णालय केवळ तालुका ठिकाणीच उभारण्यात येत असत. या रुग्णालयासाठी डॉ. पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन दिली. याबरोबरच तेरमध्ये चांगल्या प्रकारचे बसस्थानकही डॉ. पाटील यांच्यामुळेच उभे राहू शकले. गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्या माध्यमातून या क्षेत्राततही लक्षवेधी काम झाल्याचे दिसून येते. तेरणा धरणातून गावाच्या पाईपलाईनव्दारे गावात पाणी पुरवठा करण्यात येतो. या बरोबरच १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सोयही गावात उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राणाजगजितसिंह पाटील हे निवडून आले आहेत. यापूर्वी राज्यमंत्री असताना तेरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना उभाण्यात त्यांना यश आले. यामुळे कॅनॉलद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा हेतू होता. मात्र मागील दोन पावसाळे कोरडे गेल्याने पुरेशा पाण्याअभावी या योजनेचा सध्या लाभ होत नाही. गावामध्ये संत गोरोबा काकांचे राहते घर, बौद्ध स्तूप यांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आणणे, गोरोबा काका यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी व मंदिराला ‘ब’ दर्जा मिळण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. तेरणा नदीवर (शिरपूर पॅटर्न) सरळीकरण व खोलीकरणाचेही मोठे काम करण्यात त्यांना यश आले आल्याचे गावात फेरफटका मारला असता दिसून येते. विविध विकासकामे करण्यात यश आले असले तरी, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. गावातील काही भागात आजही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून व्यापारी संकुलाची उभारणी करावी अशी मागणी असली तरी मुबलक गाळे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.