शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

टँकरच्या पाण्यावर फुलविली बाग

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या.

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या. टँकरने पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला असला तरी आता बाग बहरल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेवराई तालुक्यातील कोळगावसह सैदापूर, माणकापूर परिसरात गेल्या काही दिवसात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबकसह फळबागा केल्या आहेत. डाळींब, मोसंबी, आंबा आदी फळबागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसात पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व कुपनलिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन बागा जोपासाव्या लागतात. सैदापूर येथील भगवानराव दातखिळ यांच्याकडे २५ एकरवर फळबागा आहेत. पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासह अरूण कांबळे, कैलास कांबळे, रामराव नरसाळे, जिजा करांडे, गणेश लोंढे, नानासाहेब गवळी, प्रल्हाद करांडे या शेतकऱ्यांनीही टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्या. यावर मोठा खर्च झाला. बागा जोपासल्याने शेतकऱ्यातून मात्र समाधान व्यक्त होते. (वार्ताहर)