शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलकुंभात सडलेले मासे अन् पक्षांची विष्ठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:30 IST

पांडुरंग पोळे , नळदुर्ग शहराची लोकसंख्या लक्षात घेवून साधारणपणे १९९५ मध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, असा या मागचा उद्देश.

पांडुरंग पोळे , नळदुर्गशहराची लोकसंख्या लक्षात घेवून साधारणपणे १९९५ मध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, असा या मागचा उद्देश. परंतु, पालिका प्रशासनाने या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम केले आहे. तेव्हापासून ते आजतागायत जलशुद्धीकरण केंद्राचा फिल्टर मिडीयाच बदललेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही नागरिकांना गढळून पाणी प्यावे लागत आहे. हे थोडके म्हणून की काय, एकेक वर्ष जलकुंभाची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जलकुंभातील पाण्यामध्ये पक्षांची विष्ठा साचली आहे. तसेच मासे अन् बेंडकुळ्याही सडलेल्या अवस्थेत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्हाण हे पाणीपुरवठा सभापती असताना जलकुंभाची साफसफाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे साफ डोळेझाक केली. अनेकवेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘एक्सपायरी डेट’चा नाही पत्तापालिकेकडून पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तुरटीचा वापर केला जातो. परंतु, तुरटीच्या पोत्यावर ना उत्पादित तारीख आहे ना बॅच नंबर. एक्सपायरी डेटही नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरील तुरटी कालबाह्य तर झालेली नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो लिटर पाण्याचा अपव्ययबोरी धरणातून राबविण्यात आलेल्या जलवाहिनीला जवळपास तीन ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात येथून प्रतिदिन किमान २५ हजार लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन दिले आहेत. येथूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून आ. मधुकरराव चव्हाण यांनी पाणीपुरवठ्यासाठी ४ कोटी २० लाख रूपये मंजूर केले होते. पालिका प्रशासनाने आराखड्याप्रमाणे पाईपलाईन टाकली नाही. त्यामुळे आजही शहराच्या चाळीस टक्के भागाला जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत नाही. ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चिंतेची मानली जाते.पालिका कर्मचाऱ्यांकडून तुरटी आणि ब्लिचिंग पावडरची नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आज उपयोगिता रजिस्टरवर ७०० किलो ब्लिचिंग व २९० किलो तुरटी शिल्लक असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र ब्लिचिंगच्या २५ किलोच्या २५ गोण्या व तुरटीच्या ५० किलोच्या आठ गोण्या एवढाच साठा जलशुद्धीकरण केंद्रावर शिल्ल होता. त्यामुळे प्रत्यक्ष साठा आणि रजिस्टवरील नोंदीमध्ये तफावत आढळून येते. ५० लाखांचा खर्च, जलवाहिनी बंदचनव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी हस्तांतरित करून घेताना पालिका प्रशासनाने ती तपासून घेतली नाही. त्यामुळे जवळपास ५० लाख रूपये खर्च होवूनही ३ किमीची जलवाहिनी उपायोगात नाही. पर्याय म्हणून जुण्याच जलवाहिणीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.