शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

तपासणीसाठीची भरारी पथके वाऱ्यावर

By admin | Updated: July 16, 2017 00:21 IST

जालना : आरोग्य, शिक्षण, पशुवैद्यकीय, महसूल विभागाचे कर्मचारी स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने काम करतात का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने भरारी पथकांची नियुक्ती केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरोग्य, शिक्षण, पशुवैद्यकीय, महसूल विभागाचे कर्मचारी स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने काम करतात का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने भरारी पथकांची नियुक्ती केली. मात्र, दोन महिन्यांत भरारी पथकांनी एकही कारवाई न केल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांनी विभाग प्रमुखांना धारेवर धरले.कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. सभेस उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष खोतकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून आयत्या वेळच्या विषयांवर बोलण्यास संधी दिली. सदस्य जयमंगल जाधव यांनी विविध विभागांचा पाच कोटींहून अधिक निधी अखर्चित असल्याचे निदर्शनास आणून देत यास जबाबदार शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. यावर मंजूर पूर्ण निधी खर्च होईल यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना खोतकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जाफराबाद व भोकरदन तालुक्यात साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. आरोग्य केंद्र पंधरा-पंधरा दिवस बंद असतात, अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात. जाफराबाद व डोणगाव केंद्रात रॅबीज व सर्पदंशाची लस उपलब्ध नाही यास जबाबदार कोण, असा सवाल शालिग्राम म्हस्के यांनी केला. उपाध्यक्ष टोपे यांनी आरोग्य अधिकारी अमोल गिते यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. आरोग्य केंद्रांच्या तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला. मात्र, वाहन नसल्यामुळे पथकांना कारवाईस जाता आले नसल्याचे गिते यांनी स्पष्ट केले. यावर खोतकर यांनी आक्षेप घेतला. अवधूत खडके यांनी जामखेड येथील आरोग्य केंद्राच्या मुद्यावरून आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लोणारभायगाव, माहेरभायेगाव, साडेसावंगी गावांमधील खराब रस्ते दुरुस्तीचे कामे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. बप्पासाहेब गोल्डे यांनी यांत्रिक विभागाने खरेदी केलेल्या सौर पंपाचा मुद्दा उपस्थित केला. यांत्रिक विभागाने शासन योजनेनुसार एक एचपीचा सौरपंप चार लाख ६९ हजारांना तर पाच एचपीचे काही पंप पाच लाख ४० हजारांना कसे खरेदी केले, याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच मठजळगाव येथे रोजगार हमीच्या कामात मृताच्या नावावर पैसे काढण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी केली. जिल्ह्यात किती रुग्णांना एचआयव्हीसारखे आजार आहेत याची नोंद आरोग्य विभागाकडे आहेत, का असा सवाल आशा पांडे यांनी विचारला. आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या उत्तरावर पांडे यांच्यासह अध्यक्ष खोतकर यांचे समाधान झाले नाही.