शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Flashback : आणीबाणीचा झटका, मतदारांनी दिला काँग्रेसला जोरदार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 19:53 IST

सहाव्या लोकसभेत औरंगाबादमध्ये विरोधकांची प्रथमच सरशी

ठळक मुद्देकाँग्रेसचे चंद्रशेखर राजूरकर पराभूतऔरंगाबादेतून बापू काळदाते विजयी

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या पाच निवडणुकांमध्ये औरंगाबादेतील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मताचे दान टाकले; परंतु इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लादून नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली. या झटक्याने देशभरात काँग्रेस विरोधी वाहणाऱ्या वाऱ्यात औरंगाबादकर सहभागी झाले. या मतदारसंघातून प्रथमच  भारतीय लोकदलाचे उमेदवार बापू काळदाते यांना भरघोस मतांनी विजयी केले. 

‘गरिबी हटाव’ची घोषणा देऊन १९७१ मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध १९७४ मध्ये सात पक्ष एकत्र आले व त्यांनी जनता दलाची आघाडी स्थापन केली. दरम्यान निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवून अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत २५ जून रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यांच्या या घोषणेने देशात खळबळ माजली. अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. 

मार्च १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेत देशात लोकसभेच्या सहाव्या निवडणुका घेण्यात आल्या. स्वतंत्र पार्टी, उत्कल काँग्रेस, भारतीय क्रांतीदल, सोशालिस्ट पार्टी, जनसंघ व काँग्रेसमधून फुटून निघालेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकत्रित येऊन जनता दलाची स्थापना केली. भारतीय लोकदलाच्या निवडणूक चिन्हावर देशभरात विरोधी पक्षांनी निवडणूक लढविली. औरंगाबादेतून बीएलडीची उमेदवारी बापू काळदाते यांना देण्यात आली. काँग्रेसने (आय) चंद्रशेखर राजूरकर यांना मैदानात उतरविले. 

विक्रमी मतदान आणीबाणी व त्याच्या जोडीला पुरुषांच्या बळजबरीने केल्या जाणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (नसबंदी)मुळे काँग्रेसविरुद्ध कमालीची नाराजी मतदारांत पसरली होती. त्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी वातावरण पार बदलून गेले. बापू काळदाते पट्टीचे वक्ते. त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. औरंगाबादची मतदार संख्या ६ लाख ५६ हजार ९९६ वर पोहोचली होती. १६ मार्च १९७७ रोजी मतदान झाले. ३ लाख ६९ हजार ३० अर्थात ५६.१७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद मतदारसंघात आतापर्यंत एवढे मतदान झाले नव्हते. 

राजूरकर पराभूतबापू काळदाते, चंद्रशेखर राजूरकर, कासीम किस्मतवाला आणि सय्यद अहमद रजा रजवी हे ४ उमेदवार रिंगणात होते. एकूण ७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती; परंतु तिघांनी अर्ज परत घेतले. बापू काळदाते यांना २ लाख १ हजार २१ (५६.४७ टक्के), राजूरकर यांना १ लाख ४३ हजार ९३२ (४०.४३ टक्के) कासीम किस्मतवाला ६ हजार ८५२ (१.९२ टक्के) आणि सय्यद अहमद रजा रजवी यांना ४ हजार १९८ (१.१८ टक्के) मते मिळाली. काळदाते यांनी ५७ हजार ८९ मतांनी राजूरकर यांचा पराभव केला. कासीम किस्मतवाला व सय्यद अहमद यांचे डिपॉझिट जप्त झाले. 

देशात पहिले गैरकाँग्रेसी सरकारमहाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाढून या वेळेस ४८ झाल्या होत्या. त्यापैकी २० जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले, तर बीएलडीचे १९, सीपीएम ३, पीडब्ल्यूपी ५, रिपब्लिकन पार्टी (खो)-१ उमेदवार विजयी झाला. देशपातळीवर बीएलडीने २९८ जागा मिळवून २५ मार्च १९७७ रोजी पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन केले. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. 

बापू काळदाते यांचा अल्प परिचयडॉ. बापूसाहेब काळदाते ऊर्फ विठ्ठल रामचंद्र काळदाते यांचा जन्म १ डिसेंबर १९२७ रोजी बीड जिल्ह्यातील इस्थळ या गावी झाला. पंढरपूर हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या टी.आर. आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. राष्ट्र सेवा दलातून आलेले, समाजवादी विचारवंत असलेले बापू सडेतोड वक्ते होते. १९६७ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश करताना त्यांनी सहकारमहर्षी केशव सोनवणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना ‘जायंट किलर’ अशी ओळख मिळाली होती. १९७७ मध्ये औरंगाबादेतून खासदार व नंतर दोनदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर ते खासदार म्हणून गेले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासह अनेक आंदोलनात ते सहभागी झाले. त्यांना सहा वेळेस तुरुंगवासही भोगावा लागला. आणीबाणीत त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. जनता दलाचे सरचिटणीस व उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची आॅफर केवळ तत्त्वनिष्ठा म्हणून त्यांनी अव्हेरली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019