शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

Flashback : औरंगाबादकरांनी रोखली देशभरात उठलेली कॉंग्रेसची सहानुभूतीची लाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:23 PM

आठवी लोकसभा : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साहेबराव डोणगावकर यांनी खेचली विजयश्री

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या सहानुभूतीची मोठी लाट आली. या लाटेने काँग्रेसला लोकसभेच्या आठव्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले; परंतु आतापर्यंत काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या औरंगाबादकरांनी सहानुभूतीची ही लाट रोखून समाजवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजयी केले. 

दहशतवाद्यांना हुसकाविण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविल्याच्या रागातून शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३० आॅक्टोबर १९८४ मध्ये हत्या केली. राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांत झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेस सहानुभूतीची लाट आली. करिश्माई नेतृत्व असलेले पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनाही शक्य झाले नाही, एवढ्या ४०४ जागा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला मिळाल्या. तरीही पंजाब व आसाममध्ये अशांतता असल्याने निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. या दोन राज्यांत निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे संख्या बळ ४१४ वर पोहोचले होते. 

अशा या वातावरणात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादकरांनी काँग्रेसचा उधळलेला वारू रोखून धरला. काँग्रेस (एस)चे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांनी काँग्रेस (आय)चे उमेदवार अब्दुल अजीम अब्दुल हमीद यांचा ९२ हजार ४१९ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत १३ उमेदवार उभे होते. त्यातील ११ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये डोणगावकर यांचा काँग्रेस उमेदवार काझी सलीम यांनी पराभव केला होता. 

सरपंच ते खासदार...साहेबराव कचरू पाटील हे डोणगावचे (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) रहिवासी. त्यांचा जन्म ६ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगरच्या सोसायटी शाळेत झाले. अंडर मॅट्रिक असलेले डोणगावकर हे कृषिवत्सल राजकारणी होते. काँग्रेसमधून बाहेर पडून ते शरद पवार यांच्यासह काँग्रेस (एस) मध्ये गेले. काँग्रेस एसचे पाच वर्षे जिल्हाध्यक्ष होते. डोणगावचे १३ वर्षे सरपंचपदी राहिलेले डोणगावकर आठव्या लोकसभेचे सदस्य झाले. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद त्यांनी भूषविले. गंगापूर तालुका शिक्षण संस्थेचे ते १० वर्षे सरचिटणीस होते. ९ एप्रिल २०११ रोजी त्यांचे निधन झाले. 

आठव्या लोकसभेत पहिल्या महिला उमेदवारऔरंगाबाद मतदारसंघात लढविल्या गेलेल्या लोकसभेच्या यापूर्वीच्या सात निवडणुकीपर्यंत एकही महिला उमेदवार नव्हती. आठव्या लोकसभेत शकुंतला रेणुकादास नाईक  यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली; परंतु त्यांना केवळ  ६९६ (टक्के ०.१४) मते मिळाली. १३ उमेदवारांच्या यादीत ही मते सर्वात कमी होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019