शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तब्बल पाच वर्षांपासून ‘पाटबंधारे’ कामाविना!

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना : जालना जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागास गेल्या पाच वर्षांत छदामही न मिळाल्याने एकही नवे काम हाती घेता आले नाही़

जालना : जालना जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागास गेल्या पाच वर्षांत छदामही न मिळाल्याने एकही नवे काम हाती घेता आले नाही़ परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाविना माशा मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. येथील जिल्हा परिषदेतंर्गत लघू पाटबंधारे विभागातील कामाच्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून तरतूद रोखून ठेवली. परिणामी गेल्या चार पाच वर्षात पाटबंधारे खात्याद्वारे एकही नवे काम या जिल्ह्यात झाले नाही. त्यामुळे सिंचनाचा टक्काही वाढला नाही. या जिल्ह्यात नवीन २०० सिमेंट बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी सर्वसाधारणपणे २५ कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे़ तसेच अस्तित्वातील पाझर तलाव व कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीसाठी आठ कोटीेंची आवश्यकता आहे़ परंतु या संदर्भात शासकीय स्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आशाताई भुतेकर यांनी सरकारकडे लेखी पत्र पाठवून तीव्र खंत व्यक्त केली होती. सरकारकडून या संदर्भात निधी उपलब्ध झाल्यास तातडीने सर्वेक्षण करता येईल़ येत्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करता येतील़ व पाणी आडविता येईल, असे स्पष्ट केले होते. भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ व्हावी, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने मार्ग काढावा असे त्या म्हणाल्या, परंतु त्यांच्या या पत्राची मंत्रालय स्तरावर दखल सुद्धा घेण्यात आली नाही. आता नव्या सरकारकडूनच या जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्र विकासाकरिता भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)ग्रामीण पाणीपुरवठा योजना मार्गी लागाव्यात म्हणून भारत निर्माण कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण कार्यक्रम राबविण्यात येतो आहे़ पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दोन टक्के निधी तांत्रिक सल्लागारास पाच टक्के निधी असा एकूण साठ टक्के निधी हा जुन्या नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी, उद्भवाचे स्त्रोत बळकटीकरणासाठी तसेच भूमिगत व सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यासाठी आवश्यक आहे़ त्यास शासकीय स्तरावरुन परवानगी दिली जात नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. ४राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांवर केंद्राचा व राज्याचा प्रत्येक पन्नास टक्के हिस्सा खर्च होतो़ २०१३-१४ या आर्थिक वर्षात जालना जिल्ह्या करिता केंद्राचा हिस्सा मागणी करुनही प्राप्त झाला नाही़ त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत़