शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

तब्बल पाच वर्षांपासून ‘पाटबंधारे’ कामाविना!

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना : जालना जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागास गेल्या पाच वर्षांत छदामही न मिळाल्याने एकही नवे काम हाती घेता आले नाही़

जालना : जालना जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागास गेल्या पाच वर्षांत छदामही न मिळाल्याने एकही नवे काम हाती घेता आले नाही़ परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाविना माशा मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. येथील जिल्हा परिषदेतंर्गत लघू पाटबंधारे विभागातील कामाच्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून तरतूद रोखून ठेवली. परिणामी गेल्या चार पाच वर्षात पाटबंधारे खात्याद्वारे एकही नवे काम या जिल्ह्यात झाले नाही. त्यामुळे सिंचनाचा टक्काही वाढला नाही. या जिल्ह्यात नवीन २०० सिमेंट बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी सर्वसाधारणपणे २५ कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे़ तसेच अस्तित्वातील पाझर तलाव व कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीसाठी आठ कोटीेंची आवश्यकता आहे़ परंतु या संदर्भात शासकीय स्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आशाताई भुतेकर यांनी सरकारकडे लेखी पत्र पाठवून तीव्र खंत व्यक्त केली होती. सरकारकडून या संदर्भात निधी उपलब्ध झाल्यास तातडीने सर्वेक्षण करता येईल़ येत्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करता येतील़ व पाणी आडविता येईल, असे स्पष्ट केले होते. भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ व्हावी, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने मार्ग काढावा असे त्या म्हणाल्या, परंतु त्यांच्या या पत्राची मंत्रालय स्तरावर दखल सुद्धा घेण्यात आली नाही. आता नव्या सरकारकडूनच या जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्र विकासाकरिता भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)ग्रामीण पाणीपुरवठा योजना मार्गी लागाव्यात म्हणून भारत निर्माण कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण कार्यक्रम राबविण्यात येतो आहे़ पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दोन टक्के निधी तांत्रिक सल्लागारास पाच टक्के निधी असा एकूण साठ टक्के निधी हा जुन्या नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी, उद्भवाचे स्त्रोत बळकटीकरणासाठी तसेच भूमिगत व सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यासाठी आवश्यक आहे़ त्यास शासकीय स्तरावरुन परवानगी दिली जात नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. ४राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांवर केंद्राचा व राज्याचा प्रत्येक पन्नास टक्के हिस्सा खर्च होतो़ २०१३-१४ या आर्थिक वर्षात जालना जिल्ह्या करिता केंद्राचा हिस्सा मागणी करुनही प्राप्त झाला नाही़ त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत़