शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

तब्बल पाच वर्षांपासून ‘पाटबंधारे’ कामाविना!

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना : जालना जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागास गेल्या पाच वर्षांत छदामही न मिळाल्याने एकही नवे काम हाती घेता आले नाही़

जालना : जालना जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागास गेल्या पाच वर्षांत छदामही न मिळाल्याने एकही नवे काम हाती घेता आले नाही़ परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाविना माशा मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. येथील जिल्हा परिषदेतंर्गत लघू पाटबंधारे विभागातील कामाच्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून तरतूद रोखून ठेवली. परिणामी गेल्या चार पाच वर्षात पाटबंधारे खात्याद्वारे एकही नवे काम या जिल्ह्यात झाले नाही. त्यामुळे सिंचनाचा टक्काही वाढला नाही. या जिल्ह्यात नवीन २०० सिमेंट बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी सर्वसाधारणपणे २५ कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे़ तसेच अस्तित्वातील पाझर तलाव व कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीसाठी आठ कोटीेंची आवश्यकता आहे़ परंतु या संदर्भात शासकीय स्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आशाताई भुतेकर यांनी सरकारकडे लेखी पत्र पाठवून तीव्र खंत व्यक्त केली होती. सरकारकडून या संदर्भात निधी उपलब्ध झाल्यास तातडीने सर्वेक्षण करता येईल़ येत्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करता येतील़ व पाणी आडविता येईल, असे स्पष्ट केले होते. भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ व्हावी, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने मार्ग काढावा असे त्या म्हणाल्या, परंतु त्यांच्या या पत्राची मंत्रालय स्तरावर दखल सुद्धा घेण्यात आली नाही. आता नव्या सरकारकडूनच या जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्र विकासाकरिता भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)ग्रामीण पाणीपुरवठा योजना मार्गी लागाव्यात म्हणून भारत निर्माण कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण कार्यक्रम राबविण्यात येतो आहे़ पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दोन टक्के निधी तांत्रिक सल्लागारास पाच टक्के निधी असा एकूण साठ टक्के निधी हा जुन्या नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी, उद्भवाचे स्त्रोत बळकटीकरणासाठी तसेच भूमिगत व सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यासाठी आवश्यक आहे़ त्यास शासकीय स्तरावरुन परवानगी दिली जात नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. ४राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांवर केंद्राचा व राज्याचा प्रत्येक पन्नास टक्के हिस्सा खर्च होतो़ २०१३-१४ या आर्थिक वर्षात जालना जिल्ह्या करिता केंद्राचा हिस्सा मागणी करुनही प्राप्त झाला नाही़ त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत़