शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

साडेपाच हजार शिक्षक बदलीसाठी पात्र

By admin | Updated: June 9, 2017 01:05 IST

औरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले असून, अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदली हक्क प्राप्त शिक्षक समजण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा बदलीपात्र आणि बदली हक्क प्राप्त शिक्षकांची यादी आज गुरुवारी शिक्षण विभागाने जि. प. कन्या शाळेच्या दर्शनी भागात डकवली आहे. या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले असून, चार दिवसांत आक्षेप प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यंदा सोपे आणि अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित केल्या असून, सोप्या क्षेत्रात सलग दहा वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले, तर अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी प्रथम प्राधान्य अर्थात बदली हक्क प्राप्त शिक्षक संबोधण्यात आले आहे. यास विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आक्षेप घेतले असून, सध्या खंडपीठाने आहे ती परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करा; पण पदस्थापना देऊ नका, असेही आदेशात खंडपीठाने म्हटले आहे. त्यानुसार शासनाने शिक्षण विभागाला सूचना दिल्या. त्या सूचनानुसार शिक्षण विभागाने सोप्या क्षेत्रात कुठेही अथवा कोणत्याही शाळेत सलग दहा वर्षांची सेवा करणारे शिक्षक तसेच सलग तीन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा करणाऱ्या शिक्षकांचा यादीत समावेश केलेला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व उपशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सांगितले की, यादी शिक्षकांच्या अवलोकनार्थ जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर डकवण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार बदलीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली जाणार आहे.