शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

साडेपाच हजार शिक्षक बदलीसाठी पात्र

By admin | Updated: June 9, 2017 01:05 IST

औरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले असून, अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदली हक्क प्राप्त शिक्षक समजण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा बदलीपात्र आणि बदली हक्क प्राप्त शिक्षकांची यादी आज गुरुवारी शिक्षण विभागाने जि. प. कन्या शाळेच्या दर्शनी भागात डकवली आहे. या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले असून, चार दिवसांत आक्षेप प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यंदा सोपे आणि अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित केल्या असून, सोप्या क्षेत्रात सलग दहा वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले, तर अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी प्रथम प्राधान्य अर्थात बदली हक्क प्राप्त शिक्षक संबोधण्यात आले आहे. यास विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आक्षेप घेतले असून, सध्या खंडपीठाने आहे ती परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करा; पण पदस्थापना देऊ नका, असेही आदेशात खंडपीठाने म्हटले आहे. त्यानुसार शासनाने शिक्षण विभागाला सूचना दिल्या. त्या सूचनानुसार शिक्षण विभागाने सोप्या क्षेत्रात कुठेही अथवा कोणत्याही शाळेत सलग दहा वर्षांची सेवा करणारे शिक्षक तसेच सलग तीन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा करणाऱ्या शिक्षकांचा यादीत समावेश केलेला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व उपशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सांगितले की, यादी शिक्षकांच्या अवलोकनार्थ जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर डकवण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार बदलीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली जाणार आहे.