शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार भाविकांनी केले गाथा पारायण

By admin | Updated: May 20, 2014 01:32 IST

औरंगाबाद : अमळनेरकर महाराज सेवा संघातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यात आज सुमारे पाच हजार भाविकांनी अभंग गाथेचे वाचन केले.

औरंगाबाद : अमळनेरकर महाराज सेवा संघातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यात आज सुमारे पाच हजार भाविकांनी अभंग गाथेचे वाचन केले. यावेळी भाविकांना जागेवरच गाथेचे वाटप करण्यात आले. आज सोमवारी सप्ताहाचा पहिला दिवस होता. २६ मेपर्यंत चालणार्‍या या सप्ताहामध्ये दररोज काकडा भजन, सकाळी विष्णुसहस्रनाम, दुपारी गाथा पारायण, सायंकाळी हरिपाठ व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जीवनचरित्र, असे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तन पार पडेल. आज दिवसभराचा दिनक्रम मोठ्या संख्येने जमा झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडला. बळीराम पाटील विद्यालयात चालू असलेल्या या सप्ताहातील भाविकांसाठी चहा, फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. सप्ताहाचा परिसर भक्तिमय करण्यासाठी विविध संत मंडळींच्या मंदिरांचे देखावेदेखील या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. यामध्ये कृष्ण मंदिर (जनाबाई जाते दळताना), गोरा कुंभार, संत तुकाराम, नामदेव महाराज, रुख्मिणी, एकनाथ महाराज, गजानन महाराज, संत सावतामाळी, पांडुरंगाचे भव्यदिव्य मंदिर त्याचबरोबर सखाराम महाराज अमळनेरकर यांच्या संस्थानाचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. अशा गाथा पारायणामध्ये केलेल्या अभंग गाथेच्या वाचनाने आध्यात्मिक व पारमार्थिक आनंद लुटणे शक्य होते. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद लुटत चला, असा संदेश सखाराम महाराज अमळनेरकर यांनी यावेळी दिला. यावेळी प्रसाद महाराज, चातुर्मास महाराज, दादामहाराज, शिरवडकर आदींची उपस्थिती होती. पहिल्या दिवशीच्या गाथा वाचन पारायणात एकूण ४,०९२ अभंगांपैकी प्रत्येकी ६४० अभंगांचे वाचन करण्यात आले.