शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

‘स्वाईन’चे पाच संशयित दाखल

By admin | Updated: March 28, 2015 00:42 IST

उस्मानाबाद : उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होईल, अशी आशा फोल ठरताना दिसत आहे़

उस्मानाबाद : उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होईल, अशी आशा फोल ठरताना दिसत आहे़ जिल्हा रूग्णालयात गुरूवारी व शुक्रवारी स्वाईन फ्लू संशयित म्हणून पाच जण दाखल झाले आहेत़ तर गंभीर प्रकृती असलेल्या दोन महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात झालेला फैलाव अद्यापही कमी होताना दिसत नाही़ या आजाराने आजवर जिल्ह्यात सात जणांचे बळी घेतले आहेत़ तर पॉझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या चौघांची प्रकृती सुधारली आहे़ जिल्हा रूग्णालयात आजवर एकूण ५८ रूग्ण संशयित म्हणून उपचारासाठी दाखल झाले आहेत़ यामध्ये गुरूवारी उकडगाव (ता़बार्शी) येथील एक ५४ वर्षीय महिला, सोनेगाव येथील एक ४५ वर्षीय महिला दाखल झाली आहे़ या दोघींचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत़ तर शुक्रवारी तिघे संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत़ यात अनसुर्डा येथील एक ६० वर्षीय वृद्ध, उस्मानाबाद शहरातील सांजा चौक येथील एक ५७ वर्षीय इसम व शहरातीलच जुना बसडेपो भागातील एक ५८ वर्षीय इसम उपचारासाठी दाखल झाला आहे़ या सर्वांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)