शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

शहरात पाच नवीन अग्निशमन केंद्रे उभारा

By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला लागलेल्या आगीमुळे शहरातील अग्निशमन सेवेचा मुद्या ऐरणीवर आला असून,

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला लागलेल्या आगीमुळे शहरातील अग्निशमन सेवेचा मुद्या ऐरणीवर आला असून, शहरात वेगवेगळ्या भागांत त्वरित पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यात यावीत, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी दिले. नवीन केंद्रे उभारण्यासाठी त्वरित निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या आगीत १२ कोटींहून अधिक मालमत्ता खाक झाली. शासनस्तरावर मनपाला प्रचंड मोठ्या प्रमाणात नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. आग लागल्यानंतर मनपाला किमान पाच ते दहा दुकाने तरी वाचविता आली असती तर मोठे यश असते. मनपाच्या अग्निशमन दलाला एकही दुकान वाचविण्यात यश आले नाही. अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार लक्षात घेऊन आयुक्त बकोरिया यांनी तीन दिवसांपूर्वीच अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित केले. अग्निशामक यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वीच मनपाला ५ नवीन अग्निशमन केंद्रे उभारा असे आदेश दिले. शहरात पाच ठिकाणी अग्निशमन केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटींचा निधी अपेक्षित असून, या कामासाठी लवकरच निविदा मागविल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली. ते म्हणाले, नगरविकास विभागाकडून शहरात अग्निशमन यंत्रणा गतिमान करण्यासाठी ५ नवीन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. अग्निशमन विभागाने ५५ पदांची गरज असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, ५५ पैकी २६ पदे तात्काळ भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशामक, अग्निशामक, वाहनचालक आणि आॅपरेटर, अशी पदे आहेत. शासन निर्णयानुसार शहरात आपत्ती व्यवस्थापन केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले.