शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

विनामोबदला शाळेसाठी दिली पाच गुंठे जमीन

By admin | Updated: May 9, 2017 23:47 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील शेतकरी मारूती मगर यांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता गावच्या वाढीव वस्तीतील शाळेसाठी मोक्याच्या ठिकाणी असलेली पाच गुंठे जमीन दान दिली.

संतोष मगर । लोकमत न्यूज नेटवर्कतामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील शेतकरी मारूती मगर यांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता गावच्या वाढीव वस्तीतील शाळेसाठी मोक्याच्या ठिकाणी असलेली पाच गुंठे जमीन दान दिली. या जागेवर शाळेची टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. एवढेच नाही, तर सात वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाणीपुरवठाही केला जात आहे. शेतकरी मगर यांच्या या दातृत्वाचे पालकांसह पसिरातील ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या हाती असताना सांगवी काटी येथील वाढीव वस्तीत शाळेला मंजुरी देण्यात आली होती. काही वर्ष ही शाळा शिक्षकाच्या राहत्या घरामध्येच भरविली जात होती. कालांतराने वस्तीशाळेचे रूपांतर प्राथमिक शाळेत झाले. शाळेसाठी इमारत उभी करण्याकरिता निधीही मंजूर झाला. परंतु, इमारतीसाठी जागाच उपलब्ध नव्हती. जागा न मिळाल्यास निधी परत जाईल, असे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती शेतकरी मारूती मगर यांना समजली. त्यावर त्यांनी शाळेच्या शिक्षकांसोबत चर्चा आणि कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वत:च्या मालकीची पाच गुंठे जमीन शाळेसाठी दान देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जागेचा मोठा अडसर दूर झाल्यानंतर प्रशासनाकडूनही या जागेवर युद्धपातळीवर इमारत उभी केली. सध्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे.विद्यार्थ्यांची पायपीट थांबलीमगर यांनी शाळेला जागा दिल्यानंतर तेथे शाळेसाठी इमारत उभी राहिली. नवीन इमारतीत शाळाही भरण्यास सुरूवात झाली. परंतु, तेथे विद्यार्थ्यांसाठी पाणी उपलब्ध नव्हते. हा प्रश्न लक्षात आल्यानंतर मगर यांनी शाळेसाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. मगर यांच्या पुढाकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्यास मदत झाली आहे.