शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांमध्ये ६६ चोऱ्या, तीन दरोडे

By admin | Updated: June 16, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तीन दरोड्यांसह ६६ ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी, इतर चोऱ्या झाल्या आहेत़ त्यामुळे चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासह शहरासह ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोनि अविनाश रायकर यांच्यासमोर असून, अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर शहर ठाण्याचा कारभार हाकताना त्यांची कसोटी लागणार असल्याचे दिसत आहे़उस्मानाबाद शहरासह पाच गावातील जवळपास दीड लाख लोकांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिस ठाण्यात एका पोलिस निरीक्षकांसह एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व ६५ कर्मचारी कार्यरत आहेत़ यात दैनंदिन रजा व दांड्या मारणाऱ्यांची संख्या जवळपास १० आहे़ तर तीन ठाणे अंमलदार, तीन वायरलेस, तीन मदतनीस, चार लॉकअप गार्ड, दोन चालक, वॉरंट, समन्स बजावण्यासाठी आठ, बारनिशी, गोपनिय आदी कामासाठी पाच, दवाखान्यासाठी एक, बसस्थानकात दोन, तुळजापूर मंदिर सुरक्षेसाठी दोन, न्यायालयाच्या कामासाठी एक उजळणीसाठी दोन, वरिष्ठ कार्यालयाशी संलग्न पाच आदी विविध कामकाज आणि नेमणुकीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५२ ते ५५ आहे़ त्यामुळे ठाण्यात केवळ दहा कर्मचारी राहतात़ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांततेत गेली असली तरी विधानपरिषदेसाठी रान पेटले आहे़ शिवाय सोशल मीडियावर रोज कोणाच्या न कोणाच्या छायाचित्राचे विटंबन होण्याचा प्रकार सुरू आहे़ त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहत आहे़ शिवाय ठाण्याच्या हद्दीत जानेवार ते मे महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे़ यात तीन दरोडे, पाच जबरी चोऱ्या, २० घरफोड्या, ४१ चोऱ्या घडल्या आहेत़ तर दोन गटात झालेल्या दहा हाणामारीच्या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले़ तर इतर सहा ठिकाणीही तुंबळ हाणामारी झाली आहे़ एकूणच वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासह कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर ठाण्यातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)वाहनांचीही चोरीठाण्याच्या हद्दीत पाच महिन्याच्या काळात झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये तब्बल २० दुचाकीसह एक चारचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे़ सहा खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंदही पोलिसांच्या डायरीत आहे़कर्मचारी वाढीची गरजगत काही वर्षापासून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा गाढा ओढावा लागत आहे़ त्यामुळे ठाण्यांतर्गत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनीही ठाण्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी वाढविण्याची गरज आहे़