शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाच महिन्यांमध्ये ६६ चोऱ्या, तीन दरोडे

By admin | Updated: June 16, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तीन दरोड्यांसह ६६ ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी, इतर चोऱ्या झाल्या आहेत़ त्यामुळे चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासह शहरासह ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोनि अविनाश रायकर यांच्यासमोर असून, अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर शहर ठाण्याचा कारभार हाकताना त्यांची कसोटी लागणार असल्याचे दिसत आहे़उस्मानाबाद शहरासह पाच गावातील जवळपास दीड लाख लोकांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिस ठाण्यात एका पोलिस निरीक्षकांसह एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व ६५ कर्मचारी कार्यरत आहेत़ यात दैनंदिन रजा व दांड्या मारणाऱ्यांची संख्या जवळपास १० आहे़ तर तीन ठाणे अंमलदार, तीन वायरलेस, तीन मदतनीस, चार लॉकअप गार्ड, दोन चालक, वॉरंट, समन्स बजावण्यासाठी आठ, बारनिशी, गोपनिय आदी कामासाठी पाच, दवाखान्यासाठी एक, बसस्थानकात दोन, तुळजापूर मंदिर सुरक्षेसाठी दोन, न्यायालयाच्या कामासाठी एक उजळणीसाठी दोन, वरिष्ठ कार्यालयाशी संलग्न पाच आदी विविध कामकाज आणि नेमणुकीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५२ ते ५५ आहे़ त्यामुळे ठाण्यात केवळ दहा कर्मचारी राहतात़ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांततेत गेली असली तरी विधानपरिषदेसाठी रान पेटले आहे़ शिवाय सोशल मीडियावर रोज कोणाच्या न कोणाच्या छायाचित्राचे विटंबन होण्याचा प्रकार सुरू आहे़ त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहत आहे़ शिवाय ठाण्याच्या हद्दीत जानेवार ते मे महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे़ यात तीन दरोडे, पाच जबरी चोऱ्या, २० घरफोड्या, ४१ चोऱ्या घडल्या आहेत़ तर दोन गटात झालेल्या दहा हाणामारीच्या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले़ तर इतर सहा ठिकाणीही तुंबळ हाणामारी झाली आहे़ एकूणच वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासह कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर ठाण्यातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)वाहनांचीही चोरीठाण्याच्या हद्दीत पाच महिन्याच्या काळात झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये तब्बल २० दुचाकीसह एक चारचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे़ सहा खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंदही पोलिसांच्या डायरीत आहे़कर्मचारी वाढीची गरजगत काही वर्षापासून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा गाढा ओढावा लागत आहे़ त्यामुळे ठाण्यांतर्गत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनीही ठाण्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी वाढविण्याची गरज आहे़