शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

पाच महिन्यांत २५ महिलांना दिले घरातून हाकलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद : मागील ५ महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागांतील २५ महिलांना त्यांच्या पतीने घरातून हाकलून दिले, तर अन्यायाला वाचा ...

औरंगाबाद : मागील ५ महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागांतील २५ महिलांना त्यांच्या पतीने घरातून हाकलून दिले, तर अन्यायाला वाचा फोडल्याने १३० महिलांवर घरातच अत्याचार होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

स्त्री शिक्षित झाली, पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करू लागली, असे भाषणात अभिमानाने आपण सांगत असतो; पण वास्तव्य दाहक आहे. याची प्रचीती कौटुंबिक हिंसाचार झालेल्या १३० महिलांच्या तक्रारीतून आली. अशा पीडित महिलांना सखी वन स्टॉप सेंटरने आधार दिला. तेव्हा ही आकडेवारी समोर आली. सासू-सुनेमधील भांडण काही नवीन नाही; पण त्यात पती मध्ये पडतो व आपल्या आईचा अपमान का केला म्हणून पत्नीला जबर मारहाण करतो, अशा ७० टक्के केसेस आहेत.

मोबाईलवर जास्त वेळ कोणाशी बोलते यावर संशय घेऊन पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या ५ टक्के केसेस, तर ३ टक्के केसेसमध्ये माहेरचे विशेषत: आईची आपल्या मुलीच्या संसारात लुडबूड अत्याचाराचे कारण बनल्याचे दिसून आले. ४ ते ५ टक्के केसेस अशा आहेत की, त्यात पीडित महिलेची चुकी असल्याचे आढळून आले.

घरातून हाकलून दिलेल्या २५ महिलांना वन स्टॉप सेंटर येथेच तात्पुरती निवासाची व्यवस्था करून देण्यात आली. १८ महिलांना वैद्यकीय, तर ५२ महिलांना पोलीस विभागाची मदत, १४ महिलांना कायदेशीर मदत मिळवून देण्यात आली आहे. १३० पैकी १०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. २० महिला ज्याच्यासाठी सासरचे दरवाजे बंद होते त्या महिलांना तिच्या सासरच्यांनी पुन्हा घरात घेतले व आज आनंदात संसार करीत आहेत. हेच सखी वन स्टॉप सेंटरचे यश असल्याचे केंद्र संचालिका ममता मोरे यांनी सांगितले.

चौकट

पीडित महिलेला मोफत मदत

पीडित महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचारानंतर या विविध विभागांकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता त्या महिलेची उरलेली नसते. हे लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने कटकटगेट परिसरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रालगत सखी वन स्टॉप सेंटरला परवानगी दिली आहे. येथे पीडित महिलांना मोफत मदत केली जात आहे.