शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत्युसंख्या खुनाच्या पाचपट...!

By admin | Updated: January 12, 2016 00:05 IST

औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये

औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. त्यामुळे अधिक काळजी घेऊन वाहन चालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र सावंत, दिलीप उकि र्डे, मनीष धूत, औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान, सेवानिवृत्त अधिकारी अशोक गिरी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, शहरातील वाहतुकीची स्थिती चांगली नाही. त्यामुळे २०१६ या वर्षात काही उद्देश ठेवून कृती करण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनी हेल्मेट सक्ती करण्याची गरज आहे. नियम मोडणाऱ्यांना दोन तास प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या अखेरपर्यंत ९९ टक्के लोक हेल्मेट वापरतील. जे एक टक्का लोक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांना आमच्या पद्धतीने कायद्याचा धडा शिकविण्यात येईल, असे अमितेशकुमार म्हणाले. १६ हजारांवर संख्या असलेल्या रिक्षांना शिस्त लागली तरच वाहतुकीत सुधारणा होईल; परंतु त्यासाठी प्रयत्न केला तर काहींचा विरोध होतो. रिक्षाचालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अन्यथा कारवाई होईल, असे अमितेशकुमार म्हणाले. ...तर ८० टक्के वाहतूक समस्या संपेल लोकांचे सहकार्य,स्वत:हून नियमांचे पालन आणि आपल्या कु टुंबियांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ देणार नाही हे तीन संकल्प प्रत्येकाने केले तरच वाहतुकीमध्ये सुधारणा होईल. आॅटोरिक्षांनी शिस्त दाखविली, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर केला आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे बंद झाले तर शहरातील ८० टक्के वाहतूक समस्या संपेल. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रत्यक्ष कृतीनेच २०१६ या वर्षात वाहतुकीत सुधारणा होईल, असेही अमितेशकुमार म्हणाले.