शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अपघातातील मृत्युसंख्या खुनाच्या पाचपट...!

By admin | Updated: January 12, 2016 00:05 IST

औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये

औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. त्यामुळे अधिक काळजी घेऊन वाहन चालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र सावंत, दिलीप उकि र्डे, मनीष धूत, औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान, सेवानिवृत्त अधिकारी अशोक गिरी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, शहरातील वाहतुकीची स्थिती चांगली नाही. त्यामुळे २०१६ या वर्षात काही उद्देश ठेवून कृती करण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनी हेल्मेट सक्ती करण्याची गरज आहे. नियम मोडणाऱ्यांना दोन तास प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या अखेरपर्यंत ९९ टक्के लोक हेल्मेट वापरतील. जे एक टक्का लोक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांना आमच्या पद्धतीने कायद्याचा धडा शिकविण्यात येईल, असे अमितेशकुमार म्हणाले. १६ हजारांवर संख्या असलेल्या रिक्षांना शिस्त लागली तरच वाहतुकीत सुधारणा होईल; परंतु त्यासाठी प्रयत्न केला तर काहींचा विरोध होतो. रिक्षाचालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अन्यथा कारवाई होईल, असे अमितेशकुमार म्हणाले. ...तर ८० टक्के वाहतूक समस्या संपेल लोकांचे सहकार्य,स्वत:हून नियमांचे पालन आणि आपल्या कु टुंबियांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ देणार नाही हे तीन संकल्प प्रत्येकाने केले तरच वाहतुकीमध्ये सुधारणा होईल. आॅटोरिक्षांनी शिस्त दाखविली, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर केला आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे बंद झाले तर शहरातील ८० टक्के वाहतूक समस्या संपेल. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रत्यक्ष कृतीनेच २०१६ या वर्षात वाहतुकीत सुधारणा होईल, असेही अमितेशकुमार म्हणाले.