शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत्युसंख्या खुनाच्या पाचपट...!

By admin | Updated: January 12, 2016 00:05 IST

औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये

औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. त्यामुळे अधिक काळजी घेऊन वाहन चालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र सावंत, दिलीप उकि र्डे, मनीष धूत, औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान, सेवानिवृत्त अधिकारी अशोक गिरी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, शहरातील वाहतुकीची स्थिती चांगली नाही. त्यामुळे २०१६ या वर्षात काही उद्देश ठेवून कृती करण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनी हेल्मेट सक्ती करण्याची गरज आहे. नियम मोडणाऱ्यांना दोन तास प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या अखेरपर्यंत ९९ टक्के लोक हेल्मेट वापरतील. जे एक टक्का लोक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांना आमच्या पद्धतीने कायद्याचा धडा शिकविण्यात येईल, असे अमितेशकुमार म्हणाले. १६ हजारांवर संख्या असलेल्या रिक्षांना शिस्त लागली तरच वाहतुकीत सुधारणा होईल; परंतु त्यासाठी प्रयत्न केला तर काहींचा विरोध होतो. रिक्षाचालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अन्यथा कारवाई होईल, असे अमितेशकुमार म्हणाले. ...तर ८० टक्के वाहतूक समस्या संपेल लोकांचे सहकार्य,स्वत:हून नियमांचे पालन आणि आपल्या कु टुंबियांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ देणार नाही हे तीन संकल्प प्रत्येकाने केले तरच वाहतुकीमध्ये सुधारणा होईल. आॅटोरिक्षांनी शिस्त दाखविली, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर केला आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे बंद झाले तर शहरातील ८० टक्के वाहतूक समस्या संपेल. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रत्यक्ष कृतीनेच २०१६ या वर्षात वाहतुकीत सुधारणा होईल, असेही अमितेशकुमार म्हणाले.