शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

आधी ५ तर बनवा, मग ५० चे सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:02 IST

१०० स्वच्छतागृहे नव्याने सुरू करण्याऐवजी, सध्या जी स्वच्छतागृहे शहरात आहेत, त्यांचीच परिस्थिती सुधारा. आणि १०० नको, पण केवळ १० ...

१०० स्वच्छतागृहे नव्याने सुरू करण्याऐवजी, सध्या जी स्वच्छतागृहे शहरात आहेत, त्यांचीच परिस्थिती सुधारा. आणि १०० नको, पण केवळ १० स्वच्छतागृहे उभारा, अशी मागणी औरंगाबादकर करत आहेत. बेगमपुरा, पैठणगेट, बॉटनीकल गार्डन, औरंगपुरा आणि जुब्ली पार्क अशा पाच ठिकाणी केवळ महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे मनसुबे ४ वर्षांपूर्वी आखण्यात आले होते. यासाठी ६५ लाखांपेक्षाही अधिक रकमेची तरतूद करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत बेगमपुरा आणि औरंगपुरा या भागातील स्वच्छतागृहे पूर्ण झाली असली तरी, कुलूपबंद अवस्थेत आहेत. बॉटनीकल गार्डन येथील स्वच्छतागृहाचा स्लॅब टाकून झाला आहे, तर जुब्ली पार्क आणि पैठणगेट या ठिकाणची स्वच्छतागृहे अजूनही जागेच्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. मग या ५ स्वच्छतागृहांची अशी बोंब असताना, १०० चा कारभार पूर्ण होईपर्यंत औरंगाबादकरांच्या किती पिढ्या होऊन जातील, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

चौकट :

भीक नको, पण कुत्रे आवर

पाठपुरावा तरी किती करायचा? सारखी मागणे करून करून शेवटी, भीक नको, पण कुत्रे आवर... अशी आमची परिस्थिती झाली आहे. ५ स्वच्छतागृहे उभी राहिली नाहीत, आता ५० जर उभी राहिली, तर ती शहरातल्या महिलांसाठी आनंदाची बाब असेल. ही स्वच्छतागृहे फायबरची बनविण्यात येणार आहेत. परंतु फायबरचा वापर न करता गुजरात, इंदोरसारखी स्टेनलेस स्टीलची टिकाऊ स्वच्छतागृहे बनवावीत. पण हे सगळे प्रत्यक्षात होईपर्यंत, आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी साशंकताच आहे.

- ॲड. माधुरी अदवंत