शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

रेल्वेच्या खड्ड्यांमुळे चुकला शाळेचा पहिला दिवस

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

औरंगाबाद : बनेवाडी येथे वर्षभरापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे विभागातर्फे नाली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु केवळ खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही.

औरंगाबाद : बनेवाडी येथे वर्षभरापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे विभागातर्फे नाली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु केवळ खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही. त्यामुळे जवळपास १५ फूट खोल असणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना याठिकाणी घडत आहेत. या खड्ड्याने येथील एका १२ वर्षाच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस चुकविला.समीर शंकर पठारे असे या मुलाचे नाव आहे. १६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने समीरने त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याने समीर १५ जून रोजी सायंकाळी घरासमोर आपल्या मित्रांसोबत खेळत होता. परंतु खेळताना अचानक तोल गेल्याने तो समोर असणाऱ्या खड्ड्यात पडला. यावेळी त्याच्या हाताला आणि हनुवटीला मोठी इजा झाली. त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हनुवटीला झालेल्या इजामुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. आतापर्यंत त्याच्यावर जवळपास ८० हजार रुपये खर्च झाले असून, रेल्वेच्या अशा अर्धवट कामामुळे समीरवर ही वेळ आली. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने नातेवाई आणि इतरांकडून पैसे घेण्याची वेळ आल्याचे समीरचे वडील शंकर पठारे यांनी सांगितले.खड्डे बुजविण्याची मागणीखड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातांची प्रशासनाने दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नितीन दाभाडे, गौतम साबळे, विकास झाल्टे, सुनील चुमकुरे, कुणाल कीर्तिशाही, पंकज भालेराव, गौतम केदारे आदींनी केली आहे.वर्षभरात अनेक जण जखमीबनेवाडी आणि राहुलनगरास जोडणाऱ्या रेल्वेपुलाच्या कामानंतर नालीसाठी खड्डे खोदण्यात आले. या खड्ड्यांच्या बाजूने वर्दळीचा रस्ता असल्याने पादचारी आणि वाहनांची ये-जा सुरू असते.अचानक तोल गेल्याने वर्षभरात अनेक जण जखमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यातच याठिकाणी पथदिवेही नसल्याने रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत. अनेक जनावरे खड्ड्यात पडून जखमी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.निधीअभावी काम थांबलेबनेवाडी येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे; परंतु निधीअभावी काम थांबले आहे. लवकरच हे सुरू होईल.-डी. चंद्रमोहन,सहायक मंडल अभियंता, द.म.रे.मुलांकडे लक्षखड्ड्यांमुळे खेळताना लहान मुले पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवावे लागत आहे.- इंदूबाई मिसाळरेल्वेचे दुर्लक्षरेल्वेने नाल्याचे काम अर्धवट सोडून दिले. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. जखमी झालेल्या मुलाच्या उपचारासाठी रेल्वेने नुकसानभरपाई दिली पाहिजे.-शैलेश झाल्टे