शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

हसण्या, रडण्याचा पहिला दिवस..!

By admin | Updated: June 17, 2014 01:12 IST

लातूर : शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही पहाटेपासूनच लगबग होती़.

लातूर : शाळेचा पहिला दिवस असल्याने सोमवारी सकाळपासून विद्यार्थ्यांसह पालकांचीही पहाटेपासूनच लगबग होती़ नवे कपडे, नवीन पुस्तके, नवीन दप्तर पाठीवर घेऊन मुले शाळेकडे निघाली होती़ पाहिल्यांदाच शाळेत जाणारी चिमुकली रडत होती़ काही मुले नवीन शैक्षणिक साहित्य सोबत घेऊन आनंदाने शाळेकडे निघाली़ तब्बल दीड महिन्याच्या सुटीनंतर शाळेची सोमवारी शाळेची घंटा वाजली़ शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी गावा-गावांत दवंडी देऊन जनजागृती करण्यात आल्याने पहिल्याच शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या होत्या़ अनेक पालक आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी शाळेत आले असता काही विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी रडू कोसळले़ शाळेची पहिल्यांदाच पायरी चढणारे विद्यार्थी चलबिचल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले़सोमवारची पहाट उजाडताच घराघरात मुलांना तयार करण्यासाठी पाल्यांची लगबग सुरू होती़ शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना उत्सुकताही होती़ शिवाय धास्तीही़ कुठल्या वर्गात बसवणार, शिक्षक कोण असणार, रिक्षा, स्कूल बसचालक कसा आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडले होते़ गाडी दारात येऊन पोहोचताच जड अंतकरणाने पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या मुलांनी बसमध्ये पाय टाकला़ तर काही पालकांनी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत जाऊन मुलांना सोडले़ जिल्हा परिषदेच्या १ हजार २८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती़ पहिल्याच दिवशी मुलांना मोफत गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले असून गणवेश, पुस्तकांबरोबर मुलांना गुलाब पुष्प देऊन प्रत्येक शाळांत स्वागत करण्यात आले़ विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी स्वत:हून शाळांचा आढावा घेतल्याने शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याने शहरासह ग्रामीण भागातील शाळा गजबजल्या होत्या़ जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांत स्वच्छता करण्यात आली होती़ रांगोळी व रंगकाम करून शाळा सजविल्या आहेत. सोमवारी प्रभातफेरी झाल्यानंतर प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पुढील वर्षभराचे नियोजन करण्यात आले़ नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबर जुन्या विद्यार्थ्यांचेही स्वागत शाळास्तरावर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांनी सांगितले. जिल्ह्यात प्राथमिकच्या ९९०, उच्च प्राथमिकच्या ८१५, जिल्हा परिषदेच्या १२८५, खाजगीच्या ६३३ शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या होत्या़ चिमुकल्यांना खाऊ वाटप़़़शहरातील श्रीकिशन सोमाणी विद्यालयात विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी गोड खाऊ दिला़ तसेच शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले़ चौधरी नगर भागातील एच़पी़ उर्दू शाळा, छत्रपती शिवाजी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले़ वरवंटी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला़ जनजागरण फेरी़़़जिल्हा परिषदेच्या शाळांनी गावागावांत प्रभातफेरी काढून लहान मुले, शाळेत पाठवा अशा घोषणा दिल्या़ वरवंटी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी गावभर प्रभातफेरी काढली़ ढोल-ताशांचा गजर करीत मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले़ श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पुस्तके वाटप करण्यात आली. संस्थाध्यक्ष शिवशंकर बिडवे, मन्मथप्पा लोखंडे, अभिमन्यू रासुरे, शिवशंकरप्पा खानापूरे, विश्वस्त के. एस.मांडे आदींची उपस्थिती होती. ‘लोकमत’कडून स्वागत...शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे शाळांत जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री देशीकेंद्र विद्यालय, श्री विद्याविकास प्राथमिक विद्यालय, श्री परिमल विद्यालय, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालय, श्री केशवराज प्राथमिक विद्यालय, श्रीकिशन सोमाणी विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी पाठशाळा, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, मारवाडी राजस्थान विद्यालय, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, श्री शिवाजी विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, श्री व्यंकटेश प्राथमिक विद्यालय, मनोज सहदेव अकॅडमी, अंबादास सूर्यवंशी प्राथमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय, एच.पी. उर्दू प्राथमिक विद्यालय, सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी विद्यालयात ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी जाऊन मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वर्षभराच्या शैक्षणिक उपक्रमाला ‘लोकमत’ने शुभेच्छाही व्यक्त केल्या. ‘लोकमत’च्या स्वागत उपक्रमाचे मुख्याध्यापकांनीही भरभरून कौतुक केले.