शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नवीन उद्योगांसाठी मुंबईहून फायर एनओसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:50 IST

एमआयडीसी भागात नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फायर एनओसीची गरज असते. पूर्वी अग्निशमन विभागाच्या तीन वेगवेगळ्या एनओसी घ्याव्या लागत होत्या. आता शासनाने एक खिडकी योजनेतून थेट मुंबई एमआयडीसीतूनच उद्योगांना एनओसी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी उद्योगांना निव्वळ सेवाच द्यायची का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एमआयडीसी भागात नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फायर एनओसीची गरज असते. पूर्वी अग्निशमन विभागाच्या तीन वेगवेगळ्या एनओसी घ्याव्या लागत होत्या. आता शासनाने एक खिडकी योजनेतून थेट मुंबई एमआयडीसीतूनच उद्योगांना एनओसी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी उद्योगांना निव्वळ सेवाच द्यायची का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मुंबईत मागील आठवड्यात एका पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी अग्निशमन अधिकाºयांना शहरातील हॉटेल, उद्योगधंदे आदींकडे तपासणी करण्याचे आदेश दिले. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले की, मागील चार-पाच दिवसांमध्ये एमआयडीसी भागातील हॉटेल, उद्योगांची तपासणी करण्यात आली. त्यांना एमआयडीसीने थेट मुंबईतून फायर एनओसी दिली आहे. त्यावर महापौरांनी या भागात आगीच्या घटना घडल्यास जबाबदारी कोणाची आहे? अशी विचारणा केली, तेव्हा आग विझविण्यासाठी महापालिकेलाच जावे लागते, असे उत्तर अधिकाºयांनी दिले. त्यानंतर महापौरांनी एमआयडीसी कार्यालयात फोन लावून याबाबत नाराजी व्यक्त केली. तुम्ही एनओसी देता तर तुमची यंत्रणा उभारा, अशा सूचना महापौरांनी केल्या. फारोळा, कायगाव, जिकठाण आदी भागातील उद्योगांना पूर्वी मनपाकडून एनओसी देण्यात येत होती. शासनाच्या नवीन नियमामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडणार आहे.एमआयडीसी भागातील हॉटेल, मॉलच्या तपासणीसाठी गेलो असता, आम्हाला आतही येऊ दिले जात नाही. गेटवरच उभे केले जाते, अशी कैफियत अधिकाºयांनी या वेळी मांडली.