शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

नवीन उद्योगांसाठी मुंबईहून फायर एनओसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:50 IST

एमआयडीसी भागात नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फायर एनओसीची गरज असते. पूर्वी अग्निशमन विभागाच्या तीन वेगवेगळ्या एनओसी घ्याव्या लागत होत्या. आता शासनाने एक खिडकी योजनेतून थेट मुंबई एमआयडीसीतूनच उद्योगांना एनओसी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी उद्योगांना निव्वळ सेवाच द्यायची का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एमआयडीसी भागात नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फायर एनओसीची गरज असते. पूर्वी अग्निशमन विभागाच्या तीन वेगवेगळ्या एनओसी घ्याव्या लागत होत्या. आता शासनाने एक खिडकी योजनेतून थेट मुंबई एमआयडीसीतूनच उद्योगांना एनओसी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी उद्योगांना निव्वळ सेवाच द्यायची का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मुंबईत मागील आठवड्यात एका पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी अग्निशमन अधिकाºयांना शहरातील हॉटेल, उद्योगधंदे आदींकडे तपासणी करण्याचे आदेश दिले. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले की, मागील चार-पाच दिवसांमध्ये एमआयडीसी भागातील हॉटेल, उद्योगांची तपासणी करण्यात आली. त्यांना एमआयडीसीने थेट मुंबईतून फायर एनओसी दिली आहे. त्यावर महापौरांनी या भागात आगीच्या घटना घडल्यास जबाबदारी कोणाची आहे? अशी विचारणा केली, तेव्हा आग विझविण्यासाठी महापालिकेलाच जावे लागते, असे उत्तर अधिकाºयांनी दिले. त्यानंतर महापौरांनी एमआयडीसी कार्यालयात फोन लावून याबाबत नाराजी व्यक्त केली. तुम्ही एनओसी देता तर तुमची यंत्रणा उभारा, अशा सूचना महापौरांनी केल्या. फारोळा, कायगाव, जिकठाण आदी भागातील उद्योगांना पूर्वी मनपाकडून एनओसी देण्यात येत होती. शासनाच्या नवीन नियमामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडणार आहे.एमआयडीसी भागातील हॉटेल, मॉलच्या तपासणीसाठी गेलो असता, आम्हाला आतही येऊ दिले जात नाही. गेटवरच उभे केले जाते, अशी कैफियत अधिकाºयांनी या वेळी मांडली.