शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

अग्निशमन केंद्रांची वानवा

By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST

अशोक कांबळे, औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़

अशोक कांबळे, औरंगाबादशहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़ निसर्गनिर्मित संकट अथवा काही आपत्ती आल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी किमान ८ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत शहरात केवळ तीनच केंद्रे असून, त्यामध्येही अपुरी कर्मचारी संख्या आहे. विशेष म्हणजे सरकारची मान्यता असूनही महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पाच अग्निशमन केंद्रांची उभारणी होऊ शकली नाही. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात आहे़ औद्योगिकरणामुळे येत्या काही काळात शहराची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. एखादे निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित संकट ओढावले, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात किमान ८ अग्निशमन केंद्रांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात सिडको, चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसर अशा केवळ तीनच ठिकाणी अग्निशमन केंदे्र आहेत. विशेष म्हणजे या तीन केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नाहीत़ त्यामुळे निम्म्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांच्यावर १८ ते २० तास काम करण्याची वेळ येत आहे़ शहरात आणखी पाच नवीन केंद्रे निर्माण करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु प्रशासनाकडून केंद्र उभारणीसाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत़ अपुरे कर्मचारीशहरात तीन ठिकाणी असलेल्या अग्निशमन कें द्रांमध्ये एकूण ८१ पदे मंजूर आहेत; परंतु सध्या ५१ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३० पदे रिक्त आहेत़ स्टेशन आॅफिसर १, उपअग्निशमन अधिकारी ४, अग्निशमनप्रमुख १, ड्रायव्हर आॅपरेटर ४, अग्निशामक १२, टेलिफोन आॅपरेटर ५ व लिपिक १ अशी पदे रिक्त आहेत़ अनेक वर्षांपासून वाढीव पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ विशेष म्हणजे कार्यरत असलेले कर्मचारी जवळपास ४० ते ५० या वयातील असल्याने त्यांना धावपळीचे काम करताना मर्यादा पडत आहेत़ स्वत:ची रुग्णवाहिका नाहीआपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन केंद्राकडे अद्याप स्वत:ची एकही रुग्णवाहिका नाही़ आपत्कालीन काळात अग्निशमन केंद्राला दुसऱ्यांच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते़ त्यामुळे अनेकदा रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावण्याची शक्यता निर्माण होते़ अग्निशमन कें द्राकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही़