शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

अग्निशमन केंद्रांची वानवा

By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST

अशोक कांबळे, औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़

अशोक कांबळे, औरंगाबादशहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़ निसर्गनिर्मित संकट अथवा काही आपत्ती आल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी किमान ८ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत शहरात केवळ तीनच केंद्रे असून, त्यामध्येही अपुरी कर्मचारी संख्या आहे. विशेष म्हणजे सरकारची मान्यता असूनही महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पाच अग्निशमन केंद्रांची उभारणी होऊ शकली नाही. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात आहे़ औद्योगिकरणामुळे येत्या काही काळात शहराची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. एखादे निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित संकट ओढावले, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात किमान ८ अग्निशमन केंद्रांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात सिडको, चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसर अशा केवळ तीनच ठिकाणी अग्निशमन केंदे्र आहेत. विशेष म्हणजे या तीन केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नाहीत़ त्यामुळे निम्म्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांच्यावर १८ ते २० तास काम करण्याची वेळ येत आहे़ शहरात आणखी पाच नवीन केंद्रे निर्माण करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु प्रशासनाकडून केंद्र उभारणीसाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत़ अपुरे कर्मचारीशहरात तीन ठिकाणी असलेल्या अग्निशमन कें द्रांमध्ये एकूण ८१ पदे मंजूर आहेत; परंतु सध्या ५१ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३० पदे रिक्त आहेत़ स्टेशन आॅफिसर १, उपअग्निशमन अधिकारी ४, अग्निशमनप्रमुख १, ड्रायव्हर आॅपरेटर ४, अग्निशामक १२, टेलिफोन आॅपरेटर ५ व लिपिक १ अशी पदे रिक्त आहेत़ अनेक वर्षांपासून वाढीव पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ विशेष म्हणजे कार्यरत असलेले कर्मचारी जवळपास ४० ते ५० या वयातील असल्याने त्यांना धावपळीचे काम करताना मर्यादा पडत आहेत़ स्वत:ची रुग्णवाहिका नाहीआपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन केंद्राकडे अद्याप स्वत:ची एकही रुग्णवाहिका नाही़ आपत्कालीन काळात अग्निशमन केंद्राला दुसऱ्यांच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते़ त्यामुळे अनेकदा रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावण्याची शक्यता निर्माण होते़ अग्निशमन कें द्राकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही़